मुख्य सामग्रीवर वगळा

फिडेल, चे आणि क्रांती - अरुण साधू

फिडेल, चे आणि क्रांती - अरुण साधू (260525)



मराठा क्रांती मोर्चा ऐन जोमात असताना राजकीय विश्लेषक राजू परुळेकर म्हणाले होते क्रांती करायला इतके लोकं नाही लागत. हातांच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांकडून क्रांती होते. त्यांचे शब्द खरे होते याची जाणीव फिडेल, चे गव्हेरा यांच वादळी जीवन, कार्य पहिल्यास होते.

आपल्याला न पटणारी, लोकशाही मार्ग डावलून सत्ताधीन झालेली व्यवस्था उलटावून टाकण्यासाठी प्रयत्न करणं, त्याचा ध्यास घेऊन बलाढ्य व्यवस्थेला, अडचणी ना सामोरे जाण, जीव पणाला लावणं हे सर्व विस्मय कारक आहे. 

चे गव्हेरा मूळचा अर्जेन्टीना चा होता. पेशाने तो डॉक्टर होता. लॅटिन अमेरिकेत तो फिरला. सामान्य जनतेच्या हालआपेष्टा पाहून तो क्रांतीचा पुरस्कार्ता झाला. फिडेल कॅस्ट्रो चा भाऊ राऊल कॅस्ट्रो याच्यामुळे चे गव्हेरा आणि फिडेल यांची ओळख झाली. फिडेल मुळे प्रभावित होऊन चे गव्हेरा क्युबन स्वातंत्र्य लढ्यात सामील झाला. 

फिडेल आणि चे 82 क्रांतीकारकां बरोबर मेक्सिको तून निघाले.(25 नोव्हेंबर 1956 ला निघाले, 2 डिसेंबर ला पोहचले.) क्यूबा च्या समुद्र किनारी उतरले तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. केवळ 12 क्रांतिकारक बचावले. त्यांनी निबीड अरण्यातून लढा सुरु ठेवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मनोबल कसं टिकवलं असेल? त्यांनी लढा कसा लढला यासाठी पुस्तक वाचावं.

1 जानेवारी 1959 बॅटिस्ता अमेरिकेला पळून गेला आणि क्यूबा स्वतंत्र होऊन संपूर्ण सत्ता फिडेल कॅस्ट्रोच्या हातात आली. 

भांडवलवादी बलाढ्य अमेरिका चा विरोध झुगारून बॅटिस्ता ची जुलमी राजवट उलटावून फिडेल, चे गव्हेरा आणि इतर क्रांतिकारक यांनी सत्ता हस्तगत केली. त्यावेळी फिडेल च वय होतं 32 वर्षे आणि चे गव्हेरा चे 29 वर्षे.

फिडेल ने भांडवलशाहीला पूर्ण विरोध करून समाजवादी राज्याची स्थापना केली.

फिडेल च्या मंत्रिमंडळात चे गव्हेरा उद्योगमंत्री होता. त्याला क्यूबा च नागरिकत्व ही देण्यात आलं होतं. क्रांती यशस्वी झालेली, चे गव्हेरा क्यूबा त आरामात जीवन जगू शकला असता पण.....

लॅटिन अमेरिकेतील इतर देशात ही क्रांती घडवून आणायची या हेतूने चे गव्हेरा ने क्यूबा सोडला. बॉलिविया देशात क्रांती करण्याच्या उद्देशाने तो गेला पण 9 ऑक्टोबर 1967 रोजी अमेरिकेच्या CIA च्या मदतीने त्याला मारण्यात आले. तेव्हा चे 39 वर्षाचा होता.

( एखाद्या अग्निशिखेप्रमाणे चे गव्हेरा च जीवन होतं. तेवढंच भडक आणि शुद्ध. पैसा, ऐश्वर्य, सुखासीनता या भावनाच त्याला माहीत नव्हत्या. त्याने आपली सारी ताकद दुसऱ्यांसाठी वाहिली. अंगीकारलेल्या व्रता विषयीच्या त्याच्या निष्ठा सखोल होत्या आणि त्यासाठी त्याने दिव्यही सोसले भयानक. )

क्रांती ही कधीही न संपणारी प्रक्रिया....

👉🏻 अत्यंत निराशा जनक परिस्थितीतही कॅस्ट्रोचा आत्मविश्वास विलक्षण होता आणि त्याच्या या आत्मविश्वासानेच सगळ्यांना हुरूप येत होता.

👉🏻 कशीही परिस्थिती आली तरी, प्रबळ शक्ती म्हणून कुणापुढे वाकायचे नाही , ही कॅस्ट्रोची जिद्द होती.

👉🏻 विजय मिळेपर्यंत झगडत राहायचे हा फिडेल चा स्वभावच होता.

👉🏻 पराभव हा मानण्यावर असतो.पराभव हा शब्दच फिडेल कॅस्ट्रोच्या शब्दकोशात नव्हता आणि नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...