मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शोधयात्रा - अरुण साधू

शोधयात्रा - अरुण साधू  "I think everybody should get rich and famous and do everything they ever dreamed of so they can see that it’s not the answer." _ jim carrey  मी कोण आहे? या जीवनाचे प्रयोजन काय? हे सर्व कशासाठी? असे प्रश्न काही माणसांना कधीतरी पडतात. अस्वस्थ करतात. काहीजण त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतातं, काहीजण त्यापासून पळ काढतांना अधिक काम, मनोरंजन यात गढून जातात. हे असे प्रश्न पडण्यासाठी किमान आर्थिक स्तर असावा लागतो. कवी नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे भाकरीचा चंद्र शोधण्यात बहुतांश जणांची हयात जाते. दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर विचार करायला वेळ कुठंय?  भौतिक संसाधनाची काहीही कमतरता नसणाऱ्या राजकुमार सिद्धार्थ ला हे प्रश्न पडले होते. विपुल संसाधनं तो सोडू शकला कारण त्याने त्याचा अनुभव, उपभोग घेतला होता, ते म्हणजे सर्वकाही नाही हे जाणलं होत. म्हणून अज्ञाताच्या शोधात तो घर सोडतो आणि गौतम बुद्ध होतो. या प्रश्नांचा शोध घेताना ताण, अस्वस्थता येते. ताण नको, जबाबदारी नको, आधार हवा, एखादा कृती कार्यक्रम हवा...
अलीकडील पोस्ट

जगणं वाचणं - डॉ राजेंद्र मलोसे

जगणं वाचणं - डॉ राजेंद्र मलोसे  राजाविज्या पट्टीचा वाचक असतो. कविता वाचून तो बेभान होतो. तिच्या निर्मितीच्या शोधात चालत निघतो. गती प्रगती जागृती.... डॉ जागृती पाटिल यांना भेटतो. तश्या त्यांच्या भेटी आधीही झालेल्या असतात. वाचनात गुंग असणाऱ्या राजाविज्या ला त्या आठवत नसतात.  ती म्हणाली, तू फक्त वाचत रहा. तो तिच्याकडे बघत राहिला, त्याला वाटलं ही जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे. राजाविज्या च्या बेभान होऊन वाचण्यावर डॉ जागृती भाळतात. त्या कामं करणार, राजाविज्या फक्त वाचणार, त्यांच्यात अलिखित करार होतो. ते एकत्र राहू लागतात. त्या दोघांच्या संवादातून राजाविज्या चा भूतकाळ उलगडत जातो. जागृती विचारते, तू का इतकं वाचत असतोस? राजाविज्या म्हणतो "वेळ चांगला जावा म्हणून वाचतो. वाचण्याशिवाय करमत नाही म्हणून वाचतो. बाकीचं सगळं विसरण्यासाठी वाचतो. समाधिस्थ व्हावं म्हणून वाचतो. हे जगणं सुसह्य व्हावं म्हणून वाचतो. माझं मन त्यात रमतं. पुस्तके मला सगळं देतात. ज्ञान, करमणूक, माहिती, कल्पना, सत्य. माझं सगळं दुःख विसरतो मी. माझी सुखाची कल्पना पुस्तके, म्हणून वाचतो. आणि हो ही माझ्या ...

वॉर्ड नं 7 सर्जिकल - भाऊ पाध्ये

वॉर्ड नं 7 सर्जिकल - भाऊ पाध्ये   मी भाऊ पाध्ये यांची वाचलेली ही तिसरी कादंबरी. तीनही कादंबरीत भानगड(प्रेम!), विरह, सेक्स आहेच. मानवी मनाला व्यापून टाकणारा दुसरा कोणता विषय असेल? भाऊ पाध्ये यांच्या लेखणीत एक प्रकारचा कोरडेपणा आहे. ते भावनांचे उदात्तीकरण करत नाहीत. वॉर्ड नंबर ७ मध्ये केवळ आकर्षण नसून ते चुकीच्या वेळी भेटलेली योग्य माणसं किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छा यांचे दर्शन घडवते. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या, जंतुनाशकांच्या वासात माणसांच्या मनात चाललेली ही 'झोंबाझोंबी' ते फार निर्भीडपणे मांडतात. 🚫 पुढे वाचल्यास कादंबरीचा 'स्पॉईलर' आहे  श्याम पैगंणकर, हा लेखक आहे. तीन पुस्तकं प्रकाशित झालीत. अपेंडिक्स च ऑपरेशन करण्यासाठी ऍडमिट झालाय. त्याची जुनी भानगड (प्रेम?) मोहना कारखानीस तिथे नर्स होती. ते दोघे लग्न करणार होते, पण एनवेळी मोहना ने माघार घेतली. श्याम ने मंदा शी लग्न केले, त्याला एक मुलगाही आहे. पण मोहना त्याच्या प्रेमाच्या आठवणीत अजूनही अविवाहित आहे. श्याम मोहना ला पूर्वीचे दिवस अनुभवण्याचा प्रस्ताव देतो, ती नाकारते. हॉस्पिटल मधील तारा सिस्टर श्याम मधी...

राडा - भाऊ पाध्ये

राडा - भाऊ पाध्ये   समाज वास्तव परखडपणे मांडणे ही भाऊ पाध्ये यांची खासियत आहे. 1975 ला त्यांची 'राडा' कादंबरी प्रकाशित झाली. यामध्ये शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली म्हणून पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती गायब करण्यात आल्या होत्या. मुंबईतील भांडवलदारांनी कामगार चळवळ संपवण्यासाठी, त्यांच्यात फूट पाडण्यासाठी शिवसेनेला ताकद दिली. त्याची कार्यपद्धती या कादंबरीत आहे. काळ, संघटन, राजकीय पक्ष कोणताही असो त्यांना चालवणारे भांडवलदार असतात. भाऊ पाध्ये निशिद्ध गोष्टी बोलून दाखवण्याचं धाडस दाखवतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. उदा.  कादंबरीतील मंदार म्हणतो " आपला बाप नेहमीच भंपक बोलतो. याने असं गोऱ्या कातडीच्या साहेबांवर मरण्यापेक्षा फोरास रोडच्या रांडेवर हा मेला असता तर आपण त्याला मानलं असतं " "दारात बाप आणि मुकुंद अंकल. म्हणजेच खूबसूरत काकूचा समाजाने मंजूर केलेला ठोक्या. पण अजून काकूचं पोट वर काढणं लेकाला जमलं नाही " मनाची उलाघाल, विद्रोह व्यक्त करणारे अशाप्रकारचे स्वसंवाद वाचकाला पदोपदी मिळतील. बाप मुलाचा संघर्ष  बहिण भावाचा संघर्ष  खूबसू...

मूळ प्रश्न???

मूळ प्रश्न??? देव आहे का नाही? आत्मा आहे का नाही? पुनर्जन्म आहे का नाही? कर्मफल सिद्धांत आहे का नाही? असेल, नसेल याने तुझ्या आजच्या वर्तमान स्थितीत काय फरक पडणार आहे?  या प्रश्नांचा विचार करून व्यर्थ जीव शिणवण्यात काय हाशील?  या प्रश्नांच्या उत्तरांवर आपला आयुष्य अवलंबून नाही. उदा. एक व्यक्ती अपघात होऊन जखमी झाली आहे. त्याला डॉक्टरकडे नेण्यासाठी प्रियजन धावपळ करत आहेत. तो म्हणतो थांबा.... माझ्या अपघाताला कारण ठरलेला माणूस उंच आहे की बुटका आहे? काळा आहे की गोरा आहे? डावखुरा आहे की उजवा आहे? कोणत्या वर्णातील आहे ? जखमी अवस्थेतील त्या व्यक्तीच्या या प्रश्नांना काही अर्थ आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात वेळ गेल्याने तो गतप्राण होणार नाही का? जीवनात जन्म, वार्धक्य, आजार, मृत्यू,विरह आहे. त्यामुळे दुःख आहे. या दुःख पासून मुक्ती कशी होऊ शकते हा खरा प्रश्न आहे.

धर्मप्रसार - म्हणजे नेमकं काय ???

धर्मप्रसार - म्हणजे नेमकं काय  ??? धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात म्हणजे नेमकं काय करतात?  एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष,आर्थिक प्रलोभन देतात. धर्मप्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेताना फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो." गर्व से कहो हम हिंदू है "" अल्ला हो अकबर " यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहे. धर्म नावाच्या कळपात परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी केलं आहे,करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांन...

Against the tide

Against the tide  for trailer click here कोळी लोकांच्या जीवनातील संघर्ष as it is या माहितीपटात दाखवला आहे. आपण सुरमई, पापलेट, कोळंबी, बोंबील याचा आस्वाद घेतो, त्यामागचा जीवघेणा संघर्ष या माहिती पटा मुळं समजतो. राकेश आणि गणेश दोघे जिवाभावाचे मित्र आहेत. मुंबईत राहतात. मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. गणेश स्कॉटलंडमध्ये शिकून आलाय. मोठी बोट घेऊन, खोल समुद्रात यांत्रिक पद्धतीने मासेमारी करतो तर राकेश मासेमारीच पारंपरिक ज्ञान वापरणारा आहे. दोघांच्याही जीवनात आर्थिक संघर्ष आहे. कर्जबाजारी होऊन बोट विकण्याची वेळ दोघांवर ही येते.  त्यांचं पुढं काय होईल? गणेश इतकं मोठं कर्ज कसं फेडणार? हे प्रश्न आपल्यावर सोडवून माहितीपट संपतो. माहितीपटात LED लाईटचा वापर हा एक अतिशय महत्त्वाचा आणि वादाचा मुद्दा आहे. हा केवळ तांत्रिक बदल नसून तो दोन पिढ्यांमधील आणि दोन विचारसरणींमधील संघर्षाचे प्रतीक आहे. ​याबद्दलचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: ​१. LED लाईटचा वापर का केला जातो? ​माहितीपटात गणेश हा आधुनिक पद्धतीचा वापर करतो. मासे पकडण्यासाठी समुद्रात खोलवर अतिशय प्रखर LED दिवे सोडल...