लक्षवेध ही कादंबरी रणजीत देसाई यांनी लिहिली आहे. अफजलखानाचा वध हा विषय आहे. कादंबरी लिहिताना नाट्यमय काल्पनिक संवाद लिहून रंगत आणण्याचा प्रयत्न होणारच, पण इतिहासाची मोडतोड होऊ नये. ही रास्त अपेक्षा आहे, नाही का? रणजीत देसाई यांनी लेखणीच्या, प्रतिभेच्या जोरावर इतिहासाचा (सत्याचा) मूडदाच पाडला आहे. स्वराज्यला फितूर झालेले इतर मराठा सरदार यांची नावं पूर्ण दिलीत. उदा. 1)खंडोजी खोपडे _ अफझल चा पोरगा फाझल खान ला पळून जाण्यासाठी मदत करणारा. 2) मंबाजीराजे भोसले (शिवरायांचे चुलत चुलते ) अफझल खान च्या वतीने चालून आले. 3) प्रतापराव मोरे (जावळीचे वतन मिळण्याची आशा ) पण स्वजातीचा असणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या आडनाव चा उल्लेख एकाही ठिकाणी केलेला नाही. एकवेळ इतपर्यंत ठीक..... पण कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफझलखान चा वकील म्हणून आला आणि शिवरायांशी बोलल्यानंतर तो double agent बनून शिवरायांना मदत करू लागला असं फार खुबीने सुचवलं आहे. यालाच म्हणतात कलमकसाई..... प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांवर त्यांच्या हयातीत एकमेव वार झाला आहे, तो या कृष्णा भास्कर कुलकर्णी याने अफजलखानाच्या व...
"ज्यांना इतिहास समजणार नाही, त्यांना वर्तमान समजणार नाही, ज्यांना वर्तमान समजणार नाही, त्यांना भविष्य घडवता येणार नाही" __कॉ. गोविंद पानसरे कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांच्या कार्याची धावती ओळख करून देणार लीडर हे पुस्तक नुकतच वाचलं. पानसरे सर यांचे नाव माहीत होतं. ब्राह्मण्यवादी सनातनी विचारसरणीने कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांची हत्या घडवून आणलेली .त्या बातमीने मला वाईट वाटलं होतं. त्यांच्या हत्येनं आपण नेमकं काय गमावलं याची जाणीव लीडर पुस्तकातून झाली. आर्थिक, शारीरिक, मानसिक झळा सोसून खस्ता खाऊन कार्यकर्ते देह झिजवतात, वेळ खर्ची करतात. समाजाचं भलं व्हावं, शोषणापासून मुक्ती व्हावी यासाठी त्याग करण्याची ही प्रेरणा कुठून येते ? बदल घडताना दिसत नाहीये, राजकीय यश मिळत नाहीये, तरी कार्यकर्ते थांबत कसे नाहीत? निराश, हताश कसे होत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लीडर मध्ये मिळतील. ज्याच्याकडे विद्याबळ, अधिकारबळ, द्रव्यबळ नाही तो बहुजन हा विचार प्रमाण मानून कॉम्रेड गोविंद पानसरे सर 63 वर्षे सामाजिक जीवनात कार्यरत राहिले. कामगारांच्या हिताची ...