मुख्य सामग्रीवर वगळा

वॉर्ड नं 7 सर्जिकल - भाऊ पाध्ये

वॉर्ड नं 7 सर्जिकल - भाऊ पाध्ये 



मी भाऊ पाध्ये यांची वाचलेली ही तिसरी कादंबरी. तीनही कादंबरीत भानगड(प्रेम!), विरह, सेक्स आहेच. मानवी मनाला व्यापून टाकणारा दुसरा कोणता विषय असेल?
भाऊ पाध्ये यांच्या लेखणीत एक प्रकारचा कोरडेपणा आहे. ते भावनांचे उदात्तीकरण करत नाहीत. वॉर्ड नंबर ७ मध्ये केवळ आकर्षण नसून ते चुकीच्या वेळी भेटलेली योग्य माणसं किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छा यांचे दर्शन घडवते. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या, जंतुनाशकांच्या वासात माणसांच्या मनात चाललेली ही 'झोंबाझोंबी' ते फार निर्भीडपणे मांडतात.

🚫 पुढे वाचल्यास कादंबरीचा 'स्पॉईलर' आहे 

श्याम पैगंणकर, हा लेखक आहे. तीन पुस्तकं प्रकाशित झालीत. अपेंडिक्स च ऑपरेशन करण्यासाठी ऍडमिट झालाय. त्याची जुनी भानगड (प्रेम?) मोहना कारखानीस तिथे नर्स होती. ते दोघे लग्न करणार होते, पण एनवेळी मोहना ने माघार घेतली. श्याम ने मंदा शी लग्न केले, त्याला एक मुलगाही आहे. पण मोहना त्याच्या प्रेमाच्या आठवणीत अजूनही अविवाहित आहे.
श्याम मोहना ला पूर्वीचे दिवस अनुभवण्याचा प्रस्ताव देतो, ती नाकारते.
हॉस्पिटल मधील तारा सिस्टर श्याम मधील लेखकावर फिदा होते. ते शारीरिक झोंबा झोंबी करतात. ती त्याच्यासमोर एकत्र राहण्याचा प्रस्ताव ठेवते. श्याम मोहना चा झाला नाही, मंदा चा झाला नाही तिथे तारा चा तरी कसा होईल?
ताराने दिलेला प्रस्तावाचा विचार करत श्याम हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतो, तारा समजून जाते. 
काही वर्षांपूर्वी श्यामला, मोहना कारखानीस असं सोडून गेली. आज श्याम तारा ला सोडून गेला.

जगात प्रत्येक जण एकदुसऱ्याला वापरून घेत असतो, अपवाद.....असतील का?

_सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...