मूळ प्रश्न???
देव आहे का नाही?
आत्मा आहे का नाही?
पुनर्जन्म आहे का नाही?
कर्मफल सिद्धांत आहे का नाही?
असेल, नसेल याने तुझ्या आजच्या वर्तमान स्थितीत काय फरक पडणार आहे?
या प्रश्नांचा विचार करून व्यर्थ जीव शिणवण्यात काय हाशील?
या प्रश्नांच्या उत्तरांवर आपला आयुष्य अवलंबून नाही.
उदा. एक व्यक्ती अपघात होऊन जखमी झाली आहे. त्याला डॉक्टरकडे नेण्यासाठी प्रियजन धावपळ करत आहेत. तो म्हणतो थांबा.... माझ्या अपघाताला कारण ठरलेला माणूस उंच आहे की बुटका आहे? काळा आहे की गोरा आहे? डावखुरा आहे की उजवा आहे? कोणत्या वर्णातील आहे ?
जखमी अवस्थेतील त्या व्यक्तीच्या या प्रश्नांना काही अर्थ आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात वेळ गेल्याने तो गतप्राण होणार नाही का?
जीवनात जन्म, वार्धक्य, आजार, मृत्यू,विरह आहे. त्यामुळे दुःख आहे. या दुःख पासून मुक्ती कशी होऊ शकते हा खरा प्रश्न आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा