राडा - भाऊ पाध्ये
समाज वास्तव परखडपणे मांडणे ही भाऊ पाध्ये यांची खासियत आहे. 1975 ला त्यांची 'राडा' कादंबरी प्रकाशित झाली. यामध्ये शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली म्हणून पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती गायब करण्यात आल्या होत्या. मुंबईतील भांडवलदारांनी कामगार चळवळ संपवण्यासाठी, त्यांच्यात फूट पाडण्यासाठी शिवसेनेला ताकद दिली. त्याची कार्यपद्धती या कादंबरीत आहे. काळ, संघटन, राजकीय पक्ष कोणताही असो त्यांना चालवणारे भांडवलदार असतात.
भाऊ पाध्ये निशिद्ध गोष्टी बोलून दाखवण्याचं धाडस दाखवतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
उदा.
कादंबरीतील मंदार म्हणतो " आपला बाप नेहमीच भंपक बोलतो. याने असं गोऱ्या कातडीच्या साहेबांवर मरण्यापेक्षा फोरास रोडच्या रांडेवर हा मेला असता तर आपण त्याला मानलं असतं "
"दारात बाप आणि मुकुंद अंकल. म्हणजेच खूबसूरत काकूचा समाजाने मंजूर केलेला ठोक्या. पण अजून काकूचं पोट वर काढणं लेकाला जमलं नाही "
मनाची उलाघाल, विद्रोह व्यक्त करणारे अशाप्रकारचे स्वसंवाद वाचकाला पदोपदी मिळतील.
बाप मुलाचा संघर्ष
बहिण भावाचा संघर्ष
खूबसूरत काकू चा मनकल्लोळ
शिवसेना - कम्युनिस्ट संघर्ष
कामगारांचा जगण्याचा संघर्ष
भांडवलदार आणि पुढारी यांचं नातं..... हे सर्व या कादंबरीत आहे. कोण कोणाला कसं वापरून घेतंय हे समजत. जगाची रीत समजते.
या कलयुगात नीती ही पैशावरून ठरत असते हे समजत. एकवेळ नक्की "राडा " वाचावी.
_सिद्धेश्वर
🚫 पुढे वाचल्यास कादंबरीचा 'स्पॉईलर' आहे
मंदार अन्नेगिरी -
हा पैसेवाल्या बापाचा वाह्यात (?)मुलगा आहे. शिक्षण सोडलं, घरच्या व्यवसायात शून्य लक्ष दिल इथपर्यंत ठीक..... पण हा मवालेगिरी करणे, दारूच्या गुत्त्यावर जाऊन राहणे, शालिनी खारकरला चालता बोलता असभ्य टोमणे मारणे यात रममाण आहे. हा भामटा घर सोडून गेलाय. घरचे त्याला वैतागले असले तरी तो पुन्हा घरी यावा म्हणून प्रयत्न करत आहेत.
मंदार हा चित्रकार, संवेदनशील मनाचा होता,परिसरातील वृक्षातोडीच निमित्त होऊन याचा बापाविषयी भ्रमनिरास झाला. नापास होऊन, व्यसनाधीन होऊन, बेभान वागून त्यानी बापाविरुद्ध बंड केलं.त्याची एक चूक..... बाप सर्व सेट करतो आणि मंदार त्याला नको असणाऱ्या मॅट्रिक्स मध्ये अडकतो.
(गुळगुळीत दाढी, कामाच्या मिटींग्स, लग्न, नाटक........)
शालिनी खारकर -
हिचा भाऊ गोरेगाव चा शाखाप्रमुख आहे. आपल्या वागण्या बोलण्या चे Consequences असतात ते भोगायची तयारी शालिनी खारकर ची असावी किंवा तेवढी समज तिला नसावी.
समाज काय म्हणेल, म्हणतो यास फाट्यावर मारून ही मनाप्रमाणे जगतेय. चूक बरोबर हे ठरवणारे आपण कोण? शालिनी -नाफेड च नातं कोणतं? प्रत्येक नात्याला नाव देणं गरजेचं आहे का? लोक काय म्हणतील याचा विचार न करता जगणारी शालिनी धाडसी वाटतेय.(किंवा मूर्ख असेल.)
खूबसूरत काकू -
सो कॉल्ड चांगल्या घरातील खूबसूरत काकू आणि शालिनी खारकर यांच्यात फरक काय आहे? मंदार ने पुन्हा घरी राहायला यावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या काकूचा हेतू नेमका काय असावा? त्याची काळजी की स्वार्थ?
सदानंद शेठ अन्नेगिरी-
हा मोठा कारखानदार आहे. कारखान्याच्या कामाचा व्याप, मुलगा मंदार चा ताप, सरकारी धोरणे यांनी त्रस्त आहे. मुलाने आपलं काम पाहावं,लग्न करून सेट हवं ही याची अपेक्षा आहे. या बाप लेकाच्या संघर्षात दोघेही आपापल्या जागी बरोबर वाटतात.
नानासाहेब खारकर-
हा गोरेगाव चा शाखाप्रमुख आहे. स्वतः रॉबिनहूड असल्याचा याचा दावा आहे. किरकोळ गुंड, दारूचे गुत्ते यांचा बंदोबस्त करून लोकांचा मसीहा बनू पाहतोय. काहीसं लोककल्याण बरचसं स्वहीत यासाठी झुंडशाही चा वापर ही यांची कार्यपद्धती आहे. बहिण शालिनी, राजकीय जीवनात अडचण ठरत असल्याने ती दत्तक घेतलं असल्याचे तो कार्यकर्त्यांना सांगतो आणि कार्यकर्ते विश्वास ठेवतात. कार्यकर्ते नेहमीच मूर्ख असतात, नाही का?
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवा