मुख्य सामग्रीवर वगळा

शोधयात्रा - अरुण साधू

शोधयात्रा - अरुण साधू 




"I think everybody should get rich and famous and do everything they ever dreamed of so they can see that it’s not the answer."
_ jim carrey 

मी कोण आहे?
या जीवनाचे प्रयोजन काय?
हे सर्व कशासाठी?

असे प्रश्न काही माणसांना कधीतरी पडतात. अस्वस्थ करतात. काहीजण त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतातं, काहीजण त्यापासून पळ काढतांना अधिक काम, मनोरंजन यात गढून जातात. हे असे प्रश्न पडण्यासाठी किमान आर्थिक स्तर असावा लागतो. कवी नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे भाकरीचा चंद्र शोधण्यात बहुतांश जणांची हयात जाते. दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर विचार करायला वेळ कुठंय? 

भौतिक संसाधनाची काहीही कमतरता नसणाऱ्या राजकुमार सिद्धार्थ ला हे प्रश्न पडले होते. विपुल संसाधनं तो सोडू शकला कारण त्याने त्याचा अनुभव, उपभोग घेतला होता, ते म्हणजे सर्वकाही नाही हे जाणलं होत. म्हणून अज्ञाताच्या शोधात तो घर सोडतो आणि गौतम बुद्ध होतो.

या प्रश्नांचा शोध घेताना ताण, अस्वस्थता येते. ताण नको, जबाबदारी नको, आधार हवा, एखादा कृती कार्यक्रम हवा (मंत्र जप, माळ जप, तीर्थाटन...) म्हणून माणसं बुवा, बाबा, महाराज यांच्या आहरी जातात. हा शॉर्टकट वाटू शकतो पण दिशाभूल आहे.

मानवी अस्तित्वाविषयी, प्रयोजनाविषयी निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तर आयती मिळत नसतात, इतर कोणाचं उत्तर तुम्ही उधार घेऊ शकत नाही. समज विकसित व्हायला पाहिजे, उत्तर आतून यायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे. 

हे प्रश्न सनातन आहेत. आपल्या आधी करोडो जीवांना पडले होते नंतरही पडत राहतील. या कादंबरीतील मुख्य पात्र श्रीधर यालाही हे प्रश्न पडले. सिद्धार्थप्रमाणे सर्व ऐश्वर्य त्यागून तोही भटकंतीवर निघाला. अज्ञाताच्या शोधात. त्याचा वर्तमानातील प्रवास आणि फ्लॅशबॅकमध्ये जाऊन उलगडणारा भूतकाळ याप्रकारे कादंबरी लिहिली आहे. वाचकाला बेभान करणारी आहे.

श्रीधर गंतव्य स्थानी पोहचतो का? त्याचा शोध संपतो का? त्याच्या प्रश्नांची उत्तर मिळतात का? उत्तर काय आहे? जाणून घेण्यासाठी शोधायात्रा नक्की वाचली पाहिजे. 

मानवी अस्तित्वाविषयीं चे हे सनातन प्रश्न तुम्हालाही छळत असतील तर तुमचेच प्रतिबिंब श्रीधर च्या रूपाने अनुभवण्याची संधी शोधयात्रा ही कादंबरी देते. आपली समज वाढायला मदत होते.

नक्की वाचावी.

_सिद्धेश्वर

📘 “शोधयात्रा” – सविस्तर आशय

“शोधयात्रा” ही कादंबरी माणसाच्या आतील प्रवासाची आणि जीवनाचा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नाची कथा आहे. या कादंबरीत लेखकाने आधुनिक जीवनातील ताण, गोंधळ, नाती आणि मानसिक संघर्ष यांचे वास्तव चित्रण केले आहे. माणूस आयुष्यात यश, पैसा, प्रतिष्ठा, नाती मिळवण्यासाठी सतत धडपड करत असतो; परंतु हे सर्व मिळूनही त्याला पूर्ण समाधान मिळत नाही. त्यामुळे तो स्वतःच्या अस्तित्वाचा आणि जीवनाच्या उद्देशाचा शोध घेत राहतो.

कादंबरीतील नायक हा संवेदनशील आणि विचार करणारा व्यक्ती आहे. तो जीवनातील अनेक प्रश्नांनी अस्वस्थ झालेला असतो. “मी कोण आहे?”, “जीवनाचा खरा अर्थ काय आहे?”, “खरे सुख कशात आहे?” असे प्रश्न त्याला सतत पडत असतात. समाज, कुटुंब आणि कामाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना त्याच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते. बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असले तरी आतून तो अस्वस्थ असतो.

लेखकाने कादंबरीत आधुनिक समाजाचे चित्रण केले आहे. बदलती जीवनशैली, स्पर्धा, अपेक्षा आणि ताण यामुळे माणूस स्वतःपासून दूर जातो. पैसा, प्रतिष्ठा आणि यश मिळवण्याच्या धावपळीत तो मनःशांती गमावतो. कादंबरीत दाखवले आहे की बाह्य यश हेच खरे सुख नसते. खरे समाधान मिळवण्यासाठी माणसाने स्वतःला समजून घेणे आवश्यक आहे.

नायकाच्या आयुष्यातील नाती, कुटुंब, मित्र आणि समाज यांचा त्याच्या विचारांवर प्रभाव पडतो. कधी त्याला आधार मिळतो तर कधी ताण वाढतो. या सर्व अनुभवांमधून तो हळूहळू जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. त्याला समजते की जीवनाचा खरा अर्थ बाहेर कुठे नसून स्वतःच्या मनात आहे.

या कादंबरीत लेखकाने मानसिक संघर्षाचे प्रभावी चित्रण केले आहे. नायकाच्या मनात सतत विचारांचे द्वंद्व चालू असते. कधी आशा वाटते तर कधी निराशा येते. पण या संघर्षातूनच त्याला स्वतःची ओळख पटू लागते. हीच त्याची “शोधयात्रा” आहे.

अशा प्रकारे “शोधयात्रा” ही कादंबरी माणसाच्या मनातील प्रश्न, जीवनातील संघर्ष आणि आत्मशोध यावर आधारित आहे. लेखकाचा मुख्य संदेश असा आहे की खरे सुख आणि समाधान हे बाह्य यशात नसून स्वतःला समजून घेण्यात आहे. जीवनाचा खरा प्रवास हा बाहेरचा नसून मनाचा असतो.

(Chatgpt)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...