मुख्य सामग्रीवर वगळा

ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार मराठे शूद्रच - प्रवीण गायकवाड

ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार मराठे शूद्रच - प्रवीण गायकवाड (170925)



मानवी जीवनात धर्माचे स्थान काय? 
हिंदू हा खरच धर्म आहे का?
बहुजन समाजाला हिंदू धर्मात स्थान काय?
शिवधर्म काय आहे? त्याची तत्व कोणती आणि त्याची गरज का?

या प्रश्नांचा वेध घेण्याची जिज्ञासा उत्पन्न करणार संक्षिप्त मुद्देसूद आणि विचार प्रवर्तक लिखाण या पुस्तकात आहे.

बहुजन कोण?
हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्यांना शूद्र ठरवले ते बहुजन अशी व्याख्या करता येईल.
(याला ही मर्यादा आहेत)

शुद्र कोणाला ठरवलं?
पुराणानुसार परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली. क्षत्रियांच्या स्त्रिया नियोगासाठी ब्राह्मण ऋषींकडे गेल्या आणि वंश वाढवला. त्यामुळे आता कोणीही क्षत्रिय राहिलेलं नाही.
( गोत्र माहीत नसलं की "कश्यप" सांगतात. आपली जन्म पत्रिका हा आपल्या मानसिक गुलामीचा आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार शूद्र असण्याचा पुरावा आहे. )

हिंदू धर्म आहे का?
भगवत गीता,अठरा पुराणे आणि चार वेद यामध्ये कोठेही हिंदू धर्म असा उल्लेख नाही. यजुर्वेद मध्ये ब्राह्मण धर्म असा उल्लेख आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हिंदू ही जगण्याची रीत आहे. (it is a way of life.)
समजा इतर कोणत्या धर्माचे शे दोनशे लोक हिंदू व्हायचं म्हणून आले तर त्यांना कोणत्या जातीत टाकणार?

1)ख्रिश्चन धर्मात प्रवेश घेण्यासाठीचा मुख्य संस्कार बाप्तिस्मा आहे.
2)मुस्लिम धर्मात प्रवेश करण्यासाठी "शहादा" (ईमानाची साक्ष) उच्चारावी लागते.
3) बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती "त्रिशरण पंचशील" म्हणते.
4)शीख धर्म यात प्रवेशासाठी “अमृत संस्कार” केला जातो.
5) हिंदू धर्मात फक्त ब्राह्मणांना मुंज हा उपनयन संस्कार केला जातो कारण त्याशिवाय वेदांचा अभ्यास करणे,यज्ञ करणे मान्य नव्हते. आणि इतर समाजाला तर तो अधिकारच नव्हता. त्यामुळे त्यांची मुंज होण्याचा प्रश्नच नाही.
 
बाळ गंगाधर टिळक म्हणायचे, "जो वेद प्रमाण मानतो तो हिंदू" आणि शूद्रांना तर वेद वाचायचे राहूद्या, ऐकायला ही धर्माशास्त्रानुसार परवानगी नव्हती. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी वेदांचा अर्थ लावला म्हणून तर त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवण्यात आल्या.

" तू शूद्र आहेस, तू राजा होऊ शकत नाहीस " असं खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना ही सनातन धर्माचा उदोउदो करणाऱ्या मनुवादी व्यवस्थेकडून ऐकावं लागलं.
राजश्री शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाकारण्यात आला हे तर सर्वज्ञात आहेच.

मराठा, राजपूत वा इतर कोणी क्षत्रिय असल्याचा बढावा करत असेल, गाडीवर "क्षत्रियकुलावतंस" लिहीत असेल तर त्यांनी एक प्रकारे चातुर्वर्ण व्यवस्थाच मान्य केलेली असते.

मनुस्मृति, बुवा बाबा, स्वामी, महाराज, भिक्षुकशाही यांच्या जोखडातून मुक्त होऊन मनगट, दंड, मणका आणि बुद्धी याच्या जोरावर स्वतःबरोबर समाजाची आर्थिक,मानसिक उन्नती साधावी, त्यासाठी सतत प्रयत्नशील असाव ही "शिवधर्माची" शिकवण आहे.

_सिद्धेश्वर

( पुस्तक खरेदी करून वाचावं. सेवामूल्य 100/-₹, जिजाई प्रकाशन )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...