मुख्य सामग्रीवर वगळा

तुरुंगरंग - ऍडव्होकेट रवींद्रनाथ पाटील

तुरुंगरंग - ऍडव्होकेट रवींद्रनाथ पाटील (280125)



तुरुंगवास भोगलेल्या एका भूतपूर्व आयपीएस अधिकाऱ्याची डायरी 

"शोकांतिका लोकांना यासाठी आवडतात कारण त्या माणसाच्या दुःखाचे कॅथरसिस अर्थात विरेचन करतात."
 - अरिस्टॉटल 

एक आयपीएस (IPS ) अधिकारी नोकरी सोडतो, तुरुंगावास भोगतो हे माझ्यासाठी अनाकलनीय होतं. त्यांनी असं का / काय केलं या कुतूहलातून पुस्तक वाचायला घेतलं. ( पुस्तकाचा विषय जेल मधील अनुभव हा असल्याने, पुस्तकात याच उत्तरं मिळत नाही.)

डीएसके यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचल्याबरोबर वाचक वेगळ्या जगात जातो. पुस्तकाच्या 432 पानात मांडलेलं हे अनुभव विश्व वाचकाला प्रगल्भ करतं , स्वातंत्र्य म्हणजे काय याची जाणीव करून देतं. या स्वातंत्र्याचं मोल जाणण्यासाठी तरी प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे.

जेलंच रुटीन, तिथलं अन्न, पाणी, बराकी, हॉस्पिटल, भिशी, हंडी, फासाडी, जेल कॅन्टीन, भोंडा वॉर्ड याच इत्यंभूत वर्णन वाचकाला येरवडा जेलची सफर घडवत. एका वेगळ्या दुनियेची रंजक तितकीच हृदयद्रावक सफर या पुस्तकामुळे घडते.

जेल मॅन्युअल, भारतीय राज्यघटना, न्याय या तत्त्वांना पोलीस प्रशासनाकडून दररोज केराची टोपली दाखवताना लेखकाने पाहिलं. यासाठी काय सुधारणा करायला हव्यात तेही लेखकाने सुचवलं आहे.

💡जेलच रुटीन 

सकाळी 6 वाजता उठणे. राष्ट्रगीत व गिनती झाल्यानंतर बाथरूम व अंघोळीसाठी नंबर लावणे. जर्मन च्या ताट व वाटीत चहा, नाष्टा घेणे. 10.30 वाजता जेवणाचं वाटप सुरु होतं, जेवण घेऊन बराकीत जाण. 11 ते 3 बराकीत लॉक राहणे. 3 ते 5 पुन्हा बाहेर सोडतात. रात्रीच जेवण 5 वाजताच घ्यायचे आणि पुन्हा लॉक अप मध्ये जायचं .(संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉक अप मध्येच )

येरवडा जेलची क्षमता 2300 कैदी आहे, प्रत्यक्षात 7 ते 8 हजार कैदी असतात. त्यामुळे एक एका बराकीत 250-300 कैदी कोंबतात. पाठ टेकवायला ही जागा मिळत नाही. जबाबदार, वॉचमन,पोलीस यांना हाताशी धरून पैसे चारून जागा मिळवता येते.

अफाट पैसा खर्च करायची ताकद असेल तरच जेल मधील जगणं काहीसे सुसह्य होऊ शकतं असं लेखकांच म्हणणं आहे.
(जेल मध्ये कितीही पैसा असला तरी आत्मसन्मान मिळत नाही. )

(न्यायालयीन कोठडी ला ही येरवडा जेल एन्ट्री असते.)

व्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही, वा नागवलं गेलं यातून निराश झालेल्या अभागी जीवांनी कायदा हातात घेतल्यावर कोण बरोबर? कोण चूक?

_ सिद्धेश्वर 

"येरवडा जेल ही अतिशय खडतर जागा आहे. खरं म्हणजे खडतर या शब्दाचा जिथे कडेलोट होतो, तिथं जेलच आयुष्य सुरू होत. आणि अशा परिस्थितीशी जुळवून घेणं ही सोपी गोष्ट नाही "
- लेखक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...