मुख्य सामग्रीवर वगळा

निवडक नरहर कुरुंदकर खंड 2,ग्रंथवेध भाग 1

निवडक नरहर कुरुंदकर खंड 2,ग्रंथवेध भाग 1
(200325)


नरहर कुरुंदकर यांनी बऱ्याच पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या, त्यातील आठ प्रस्तावना या पुस्तकात आहेत. (समीक्षा )
हे पुस्तक मी प्रयत्न पूर्वक वाचलं. माझी आकलन शक्ती किती तोकडी आहे याची मला जाणीव झाली.

करुंदकर यांनी रणजीत सावंत लिखित श्रीमानयोगी कादंबरी ला प्रस्तावना लिहिलीत. शिवाजी महाराजांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतो, चौरस विचार कसा करावा हे समजत. लेखाच्या ओघात त्यांनी दादोजी कोंडदेव, रामदास, अनाजी पंत चिटणीस यांची भलामन केलेली पटली नाही.

इरावती कर्वे यांच्या संस्कृती पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिलीत. या बाई मानववंश शास्त्रज्ञ होत्या. वयाच्या पंचविसाव्या वर्षी विदेशात जाऊन पदवी संपादन करणं, संसार करता करता संशोधनाचे कार्यही करणे ही जिद्द यांना कोठून येते? जातीव्यवस्था वर्ण व्यवस्थेतून आलेली नाही हे कुरुंदकरांनी यात पटवून दिलेल आहे. माझं पूर्व संस्कारीत मन हे मानायला तयार नाही हा भाग वेगळा.

राची ढेरे यांच्यावर लिहिलेल्या लेखात शैव वैष्णव परंपरा, महानुभाव पंथ व वारकरी पंथ याविषयीचे विवेचन केलं आहे.
(हा लेख वाचनं फार कष्टदायक होतं. काहीच समजत नव्हतं. आपला आवाका किती आहे? संशोधन, समर्पण म्हणजे काय असतं? या जाणीवेसाठी वाचावा .)

महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा सत्याग्रह नव्हताच असं ते मांडतात, त्याची कारणमिमांसाही करतात. अधिवेशन महाडला घेण्याची, त्याचे अध्यक्षपद आंबेडकरांनीच भूषवावे असा आग्रह, चवदार तळ्यावर जाऊन जाहीर रित्या पाणी पिणे या सर्वांच्या मागे आनंद चित्रे ही ब्राह्मण व्यक्ती होती असं ते मांडतात.

गांधी आंबेडकर यांच्यातील पुणे करार याविषयीची नवीन माहिती मिळते. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले असते तर त्यांना 71 मतदारसंघ मिळणार होते, संयुक्त मतदार संघ स्वीकारल्याने 151 मतदारसंघ मिळाले. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांचाही विजय होता.

या पुस्तकातील काही मतं पटत नाही, बरं नाही पटली तर ते खोडून टाकायला तसं प्रमाण पण दाखवता यायला पाहिजे, तेवढा अभ्यास आणि तयारी माझी नाही, मग त्यांनी काढलेला निष्कर्ष निमूट स्वीकारायचा का?

_सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...