मुख्य सामग्रीवर वगळा

चमकीला

चित्रपट

चमकीला


स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारे दहशतवादी कलाकारांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादतात. धर्म, नैतिकता याचे अर्थ हे धर्मांध ठरवू लागले आणि समाजावर लादू लागले की अराजक निर्माण होतं. यात स्त्रिया, कलाकार, सामान्य जनता यांची होरपळ होते.

35-40 वर्षांपूर्वी पंजाब राज्य धर्मांध दहशतवादा मुळे अस्थिर झालेल.हजारो निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला, त्यातलाच एक "अमर सिंग चमकीला "

'जात' हे भारतीय समाजाच वास्तव आहे.चांभार जातीत जन्मलेला चमकीला पोटाची खळगी भरण्यासाठी कापड गिरणीत काम करायचा. गाणं लिहिणं, चालीत म्हणणं, वाद्य वाजवण ही त्याची आवड होती. त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देतं नाही, चमकीला नोकरी सोडून स्वप्नांचा पाठलाग करायचं ठरवतो.

आवडणारं काम करायला मिळणं, त्यातून बऱ्यापैकी पैसा येणं हा दुर्मिळ योग अमर सिंग चमकीलाच्या आयुष्यात त्याने हिंमत दाखवल्यामुळे आला.

चमकीला गाणं गाणारी स्वतःची पार्टी उभी करून जनतेच मनोरंजन करतो. अल्बम येतात, परदेशात त्याचे कार्यक्रम होतात, पैसा येतो, सर्व ठीक सुरु असतं. पण 

" तुझी गाणी अश्लील आहे ती म्हणायची बंद कर, पोटापाण्यासाठी दुसरा उद्योग कर "असा फतवा धर्मांध दहशतवाद्याकडून येतो.

चमकीला काही काळ थांबतो,पण आतील उर्मी त्याला स्वस्थ बसून देत नाही. एक ना एक दिवस सर्वांनाच सरणावर जायचे आहे याची जाण असलेला चमकीला त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहतो.

८ मार्च १९८८ चमकीला, त्याची पत्नी आणि दोन साथीदार यांना गोळ्या घालून ठार मारलं जात. अमरसिंग चमकीला त्यावेळी २८ वर्षाचा होता.

एखाद्या गोष्टीचा ध्यास असणं, नाद असणं त्यापायी यशाच्या समाज मान्य कल्पना, आर्थिक स्थैर्य झुगारून जीवन जगणं किती जणांना श्यक्य होतं? असे कित्येक कलाकार ९ ते ५ मध्ये गुरफटून गेले असतील ? 

( नेटफ्लिक्स वर चमकीला चित्रपट उपलब्ध आहे. पाहिल्यास वेळ सत्कारणी लागेल.)

_सिद्धेश्वर (130624)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...