मुख्य सामग्रीवर वगळा

नरकातला स्वर्ग - संजय राऊत

नरकातला स्वर्ग - संजय राऊत (081025)



ज्यांनी त्याग केलाय, बलिदान दिलंय अशांना किती काळ आपला समाज लक्षात ठेवतो? कित्येक स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, वैज्ञानिक, सत्याग्रही यांनी समाज उन्नती साठी सर्वोच्च त्याग केला. 

पण

मला काय त्याचे..... असं म्हणून आपल्याच चौकटीत अय्याशी करत राहणारा मध्यमवर्गीय मुर्दाड समाज आज कशानेच अस्वस्थ होत नाहीये. मग संघर्ष कोणी? कोणासाठी? कशासाठी करायचा? असा विचार मनात येऊन जातो.

तडजोड स्वीकारली तर पैसा, पद, प्रसिद्धी मिळणार, अय्याशी सुखनैव उपभोगता येणार याची खात्री असूनही काही धुरंधर व्यक्तिमत्व तो मार्ग स्वीकारत नाहीत. 
यांची जडणघडणं नेमकी कशी होते?
यांना संघर्षाची प्रेरणा कोठून येते? 

तथाकथित बनावट पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडी कडून अटक होते. ऑर्थर रोड कारागृहात त्यांनी 101 दिवस काढले. ईडी , तुरुंग प्रशासन यांची कार्यपद्धती आणि आपली राजव्यवस्था याबाबतचे त्यांचे अनुभवकथन शासन व्यवस्थेचे विक्राळ स्वरूप दाखवते.

अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा आणि थरार देणारं हे अनुभवकथन वाचलंच पाहिजे.

संघर्ष करण्याचे, लढा देण्याचे बळ अशाच अनुभवामधून येते.

💡पुस्तकातून

👉🏻"तुमची बाजू सत्याची असेल तर मागे हटू नका. संकटाला घाबरू नका. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे रहा"

👉🏻"युद्ध अद्याप संपले नाही. ते सुरूच आहे. प्रत्येकाला आपापले युद्ध लढावेच लागले. मग तो श्रीराम असेल नाहीतर गौतम बुद्ध! युद्ध हे निर्भयपणे लढायचे असते. बेडर बनून न्यायासाठी लढणाऱ्यांनाच लोक लक्षात ठेवतात"

👉🏻मारता मारता मरावे आणि लढता लढता जगावे.

👉🏻अपना अपना युद्ध सभी को 
हर युग मै लडना पडता है |
और समय के शिलालेख पर 
खुद को खुद गढना पडता है ||

👉🏻गरीब, कमजोर लोकांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी जे लोक घाबरतात ते डरपोक लोक गुलामच असतात.

_ संजय राऊत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...