मुख्य सामग्रीवर वगळा

इधोस- डॉ कृष्णा भवारी

इधोस- डॉ कृष्णा भवारी




धोंड्या, हौसा, मंगाजीराव , बाळबा, काळ्या, भामा,मारत्या,धावज्या,नामद्या, बब्या, पांडबा.... आणि बेगडेवाडी.
रानमेवा खाऊन जगणारी ही साधी माणसं, भले गरिबीत, आभावात जगत असतील पाण त्यात दारिद्र्य नव्हतं. भोवतालची झाडं, पायवाट,जल- जंगल -जमीन याच्याशी एकरूप असलेली. शेती करायची, हिरडा काढायचा हेच यांचं उत्पन्न. जे काही येईल त्यात बाजार करायचा.
बेगडेवाडी हे गाव योजून लेखकाने आदिवासी लोकांची जिंदगी, रितिरिवाज मांडले आहेत. शिकारीला जाण, धोंड्याच लग्न त्यापायी साऱ्या गावाची धावपळ,मटन खाऊन पोट डांबरल्यावर भगताला बोलावणं, मासे - खेकडे धरायला जाणारे धावज्या, नामद्या. मंगाजी पाटलाचं तर्हेवाईक वागणं अशा अनेक प्रसंगातून आदिवासी लोकं, त्यांचं गाव, त्यांची जगण्याची रीत वाचकाला मोहवून टाकते.

पण... बेगडेवाडी च्या लोकांना विस्थापित व्हावं लागणार आहे, त्यांची इच्छा नसताना.

निसर्गपूरक जीवनशैली असणाऱ्या आदिवासीनाच कधी अभयारण्य साठी,कधी धरणासाठी, कधी कोळसा खाण साठी विस्थापित व्हावं लागत. पिढ्यानंपिढ्या जल -जंगल -जमीन याच्याशी असलेली नाळ तुटणं हे किती यातनामय असेल? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा डॉ कृष्णा भवारी लिखित 'इधोस '.

(ता. क. हिंदुत्ववादाच्या नावाखाली जहरी विष पसरवणाऱ्या विषारी संघटना आदिवासींना वनवासी म्हणू लागले आहेत. आदिवासींची असणारी वेगळी ओळख पुसून त्यांचं ब्राह्मणीकरण वेगाने सुरू आहे.)

(ग्रामसभेचा ठराव नसताना छत्तीसगढ मधील हाथरस ची जमीन कोळसा खाण प्रकल्पसाठी अदानीला देण्यात आली. स्थानिक आदिवासीच दमन करण्यात आलं. लाखो झाडांची कत्तल झाली.प्रसार माध्यमात यांचा आवाज नाही.

विकासाच्या नावाखाली जंगल हडप करून आदिवासीवर वरवंटा फिरवतात, स्थानिक जनतेचं मत नाकारलं जातंय. याच उदाहरणं म्हणजे 'हाथरस'. तिथेही आदिवासीच्या जीवनाचा 'इधोस' झालाय.)

👉🏽भाकरीला कोंडा उशाला धोंडा, अंगावर चिंध्या अन् झोपायला दुंद्या, घेणार्‍या माझ्या समस्त आदिवासी बांधवांना!

👉🏽“या बांबलीच्यांना काय माहीत, एका हिरडेच्या दान्यासाठी मानूस शेंडेच्या बुंध्यावं जाताय.”

👉🏽“दिसायाच तेवढा रुबाब. ‘बोलनं पोपटाचं अन् करनी गिधाडाची.”

👉🏽“आरं, म्हनत्यात ना, गोरा तो गुवाचा खोरा अन् काळा तो मोत्याचा जाळा!”

👉🏽“बाप तसा बेटा अन् कुंभार तसा लोटा."

👉🏽‘उधारीचं पोतं अन् हातभर रितं.’

👉🏽मेलेल्या मानसाच्या गांडीत पिळला तं उठून पळंल इतका आंबाट.

👉🏽“कॉनाच्याय नादी लागावा पन दारुड्याच्या नादी लागू नये.”

👉🏽गळ्यात माळ अन् पॉटात काळ..

👉🏽‘वाण्याचा घोडा अन् पाटलाचा भूषाण’ अशी तर्‍हा झाली.

👉🏽‘कलीयुगाची झालेय भेळ, लावलं रताळं आलंय केळं.’

👉🏽आगीन गाडी, बिगीन गाडी बाळा हिच काय रे सासुरवाडी

👉🏽आज लगीन, दारी आनंद बापाच्या डोळ्याला पानी तुझ्या लग्नाची, तुझ्या लग्नाची बोलते आता मी गानी...

👉🏽“बाळ्या, ये पॉरा. आरं, म्हनत्यात, भावकी तोडावी पन गावकी तोडू नये. लांबचा इचार कर. लय वरतोड बोलू नको.”

👉🏽“दारू पिईन तं गाढवीचं मूत पिईन.”

👉🏽आता ‘जीव जाव का जिलाबी खाव’ लढायचा म्हनजे लढायचा.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...