इंडिया इन स्लो मोशन - मार्क टुली (अजित ठाकूर) (130126)
मार्क टुली हे बीबीसी चे पत्रकार होते. भारतीय राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध आला. दीर्घकाळ भारतातील वास्तव्य, त्यात पत्रकारितेचे काम यामुळे त्यांचा अनुभव विशाल आहे. त्यातील काही ठळक अनुभव या पुस्तकात मांडले आहेत.
भारतीय राजकारण,नोकरशाही, समाज याविषयीच आपल आकलन वाढवणारे हे पुस्तक वाचनीय आहे.
भारताच्या प्रगतीचा क्रमांक एक शत्रू निगरगट्ट नोकरशाही आहे या निष्कर्षापर्यंत वाचक येतो.
💡श्रीरामाचा नव्याने शोध
6 डिसेंबर 1992, बाबरी मशीद पाडली तेव्हा लेखक स्वतः तिथे उपस्थित होते. तो घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे. सहा-सात वर्षानंतर ते पुन्हा अयोध्येला जातात. त्यांना आयोध्या हे क्षेत्र कसं वाटलं? त्यांनी काय पाहिलं? याचे विस्तृत वर्णन या लेखात आहे.
हिंदू समाज, बहुजन बांधव कर्मकांडांच्या चक्रव्यूहात अडकलेले होते, आहेत. काहीच बदललेलं नाही हे जाणवून निराशा येते.
💡अपात्री दान
बालमजुरीच्या निर्मूलनासाठी झटणारा एकाकी कार्यकर्ता कैलास सत्यार्थी..... लाब... लाब.... प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असू शकते,असते.
गालिचा तयार करणारे, विणकाम करणारे तीन लाख पेक्षा जास्त बालमजूर आहेत असं भासवून कैलास सत्यार्थी व रुग्मार्क कंपनी यांनी बरंच नावं कमावलं, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी होती. या प्रकरणाचं शीर्षक अपात्री दान किती सार्थक आहे याची जाणीव होते.
सामाजिक काम करणारे, तसा भास निर्माण करणारे..... यांचेही पाय मातीचेच असतात.(बऱ्याचदा)
खरा नायक नेहमीच पडद्यामागे राहतो का? एडवर्ड ओकली सारखा!
💡 चर्चचे बदलते अंतरंग
गोव्यातील चर्च चा, तेथील वेगवेगळ्या उपासना पद्धतींचा मागोवा या लेखात घेतला आहे. विचारी मनाला निराश करणारी, भातुकलीच्या खेळा समान असलेली पूजा पद्धती जवळपास सर्वच धर्मात आहे. हालेलुया हालेलूया म्हणून नाचल्याने आजार कधी बरे होतात का?
जगात चमत्कार नसतो, चमत्काराचा दावा करणारे धूर्त असतात, त्यावर विश्वास ठेवणारे पढतमूर्ख असतात.
💡 सायराबाद ची निर्मिती
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या चंद्रबाबू नायडू यांना लेखक भेटतात. त्यांच्या सरकारकडून डिजिटल संगणीकृत सेवांचा बोलबाला सुरू असतो, याविषयी जाणून घेतात. विरोधी पक्षनेते, उच्च प्रशासकीय अधिकारी यांनाही भेटतात. लेखकाचे अनुभव वाचल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांचे कौतुक वाटते, त्यांच्याकडे दूरदृष्टी होती.
( आज रोजी त्यांचे राजकारण फॅसिस्ट वादाकडे झुकलं आहे असं वाटतं.)
भारतीय नोकरशाहीची स्थितीवादी वृत्ती भारताच्या विनाशाचं कारण ठरत आली आहे.या परिस्थितीत आजही फरक नाही असा अनुभव येतोय.
💡 सुफी आणि एक साधा भोळा धर्म
बऱ्याचदा सत्य काय आहे हे जाणून न घेता आपण काही धारणा बनवतो. भारतात,जगात इस्लामबद्दल तस झालेल दिसत.
निजामुद्दीन एक्सप्रेस मला माहित होती,पण निजामुद्दीन हे एक पीर आहे. संगीत, कव्वाली याचा ते स्वीकार करतं. ही एक सुफी परंपरा आहे . याउलट तबलीघी विचार आहे. तो पीर, संगीत, कव्वाली यांना मान्यता देत नाहीत.
सर्व शक्तिमान अल्लाच्या आराधनेसाठी पीरची आवश्यकता नाही असे तबलीघीचं म्हणणं आहे.
आधुनिकतेकडे, आजच्या जीवन मूल्यांकडे तबलिघीनीं पाठ केली आहे.
सुफी विचार संत परंपरेला मानणारा आहे. मुस्लिम समुदायाचे व्यापक हीत या विचारात आहे असं वाटतं.
💡पुस्तकातील काही उतारे
👉🏻बऱ्याच वेळा मला असं जाणवतं की भारतामध्ये सरकार हीच जनतेची समस्या आहे, समस्येचं उत्तर नाही.
👉🏻भारतातील राजकीय नेत्यांनी देशासमोर असलेली सगळ्यांत स्पष्ट समस्या म्हणजे 'वाईट प्रशासन' या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं असतं तर या कालबाह्य पद्धती केव्हाच लय पावल्या असत्या; परंतु त्यांच्याच हितसंबंधांच्या ते आड आलं असतं म्हणून राजकारण्यांनी जातीपातीचे प्रश्न उकरून काढून मतदारांचे लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवले आहे.
👉🏻 वाईट प्रशासन हीच भारताच्या प्रगतीला खीळ घालणारी सर्वात गंभीर गोष्ट आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा