परिवर्तनाचे दोन पाईक महात्मा ज्योतिबा फुले आणि न्यायमूर्ती रानडे - मधू दंडवते(140925)
जनतेचे हित पाहण्यासाठी, तिला योग्य दिशा देण्यासाठी राजकारण असतं असं समजून राजकारणात येणारी एक पिढी होती, त्यातील मधू दंडवते हे एक....
मधु दंडवते आपल्या कोकणातील राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले. जनता सरकारमध्ये रेल्वेमंत्री, व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री आणि 96-97 साली नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
प्रबोधनाचे अग्रदूत असणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या विषयी त्यांनी दोन भाषणे केलेली ती या पुस्तकात आहेत.
दैववाद, अंधश्रद्धा यातून भारतीय समाज बाहेर यावा, पाश्चिमात्य प्रबोधनाच्या विचारांचा अंगीकार करून भारतीय समाजाने उन्नती करावी असं या दोन्ही महापुरुषांचे मत होतं. इंग्रजी राज्य हे इष्टापती आहे असं दोघांचही मत होत. सामाजिक काम करण्यासाठी संस्थात्मक रचना हवी या विचारातून दोघांनीही संस्थात्मक कामाची उभारणी केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची, न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली.
स्त्रियांची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही असे या दोघांचेही मत होतं, त्यानुसार त्यांनी कृतीही केली.
न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला पण स्वतः विधुर झाल्यानंतर विधवेशी विवाह न करता रमाबाई (13 वर्षे) यांच्याशी विवाह केला. रानडे यांनी त्यांच्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह कधीही घडवून आणला नाही. असो..
महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, विधवा विवाहाचा पुरस्कार करून बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, यशवंत हा मुलगा दत्तक घेतला, विधवांचे केशवपान होते त्या विरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणला. हंटर कमिशन समोर बहुजनांच्या शिक्षणाची विदारक परिस्थिती मांडली. मानवी उन्नतीसाठी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला....(शब्द मर्यादा मुळे थांबतो.)
सर्व संस्था, शासन,राजकारण,धर्मकारण यांचा उद्देश आहे मानवाचा विकास...
या मानवी विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे यांनी समाजातील प्रस्थापितांशी संघर्ष केला. ही प्रेरणा आपल्या मनात चेतवली जावी यासाठी हे पुस्तक खरेदी करून वाचा.
(साधना प्रकाशन, किंमत 75 रुपये)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा