मुख्य सामग्रीवर वगळा

एक झाड दोन पक्षी - विश्राम बेडेकर

एक झाड दोन पक्षी - विश्राम बेडेकर 


माणूस हा विचार करू शकणारा प्राणी आहे. मोह मत्सर वासना उदात्त भावना यांचा उद्रेक कमी जास्त प्रमाणात होतं राहणाऱ्या, झालेल्या चुकातून न शिकणाऱ्या माणसाचं आत्मकथन म्हणजे एक झाड दोन पक्षी

“एक झाड – दोन पक्षी” हे शीर्षकच सूचक आहे. एकच झाड, पण त्यावर बसलेले दोन पक्षी 
जणू एकाच व्यक्तीत वसलेली दोन मने.
एक मन समाजात वावरणारं, जबाबदार, समजूतदार.
दुसरं मन अंतर्मुख, प्रश्न विचारणारं, असमाधानी.
हे आत्मचरित्र म्हणजे घटनांची यादी नाही,
तर लेखकाच्या आत चाललेल्या संघर्षाचा प्रामाणिक लेखाजोखा आहे. अनुभव घेणारा तो आणि चिंतन करणारा तो यांच्यातील संवादातून विश्राम बेडेकर यांचा जीवनकाल उलगडत जातो.

रणांगण कादंबरीचे लेखक म्हणून विश्राम बेडेकर माहित झाले होते. त्या कादंबरीतील हार्टा हे पात्र, तिने लिहिलेली शेवटची तीन पत्र आजही मनात रुतून आहेत, तेव्हाच "एक झाड दोन पक्षी" हे आत्मचरित्र विकत घेतलेलं.

ऑगस्ट 1906 मध्ये विश्राम बेडेकर यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांनी शिक्षणाला, इंग्रजी भाषेला, अवांतर वाचनाला, पाठांतर, वक्तृत्व याला महत्व दिल, त्यावर त्यांनी भरपूर काम केलं. जन्मताच मिळालेल्या सांस्कृतिक वारशाचा त्यांना खूप फायदा झाला. BA, MA होऊन त्यांनी वकिलीची परीक्षा पास केली.

आपल्या मुलाने मोठा वकील होऊन घराचं दारिद्र्य दूर करावं, आपल्याला घोडा गाडीतून फिरवावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण.....
घरच्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध विवाह करून दिल्याने ते नाराज झाले, घराबाहेर राहू लागले.

मूर्ख लोक नको तिथे धडपडतात (हे त्यांचेच शब्द) या म्हणी प्रमाणे विश्राम बेडेकर बलवंत नाटक कंपनीच्या सहवासात आले. पुढे ही कंपनी चित्रपट व्यवसायात आली आणि बेडेकरांच्या आयुष्याने कायमचे वळण घेतले. त्यांनी निर्माण केलेल्या नाटक, चित्रपट याचे विस्तृत अनुभव यात दिले आहेत. 
व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, बाबूजी पेंढारकर, हरी मोटे, दीनानाथ, प्रभात स्टुडिओ आणि एकूणच त्याकाळची चित्रपट सृष्टी त्यातील माणसं, त्यांचं विक्षिप्त वागणं हे अनुभव माणसांविषयी, जीवनाविषयी आपली समज वाढवत.

बेडेकर शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला सिनेमॅटोग्राफी अभ्यासासाठी गेले होते. लंडनला पोहोचण्यास सहा महिने उशीर झाला, 6 महिने कोर्स केला. पुरेशी उपस्थिती नसल्याने परीक्षेला बसू दिले नाही. युद्धाची धामधुमी, आर्थिक तारांबळ यामुळे आणखी एक वर्ष थांबणे शक्य नव्हतं. इटलीहून परतीच्या बोटीने भारताकडे निघाले. परतीच्या प्रवासातील अनुभव रणांगण च्या निर्मितीस कारण ठरले.

बेडेकरांनी त्यांच्या आईचा, वडिलांचा, पहिल्या पत्नीचा, मुलाचा, बाळुताईंचा, स्वतःचा असा कित्येकांचा अपेक्षाभंग केला. त्यांच्या वाट्याला ही अपेक्षाभंगाचं दुःख आलं, त्यातून आर्थिक, मानसिक ओढाताण झाली. या सर्वांचा प्रांजळ लेखाजोखा या आत्मचारित्रात आहे.

💡बेडेकरांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 

रामशास्त्री, चूल आणि मुल, अमर भूपाळी, शेजारी, विनोबा भावे माहितीपट

💡बेडेकरांच्या अनुभवाच मला वाटलेलं सार

👉🏻माणसं चुकांमुळे शहाणी होतं नाहीत.
👉🏻ऐनक्षणी कच खाऊन उदार होतात.
👉🏻कायद्याला दुय्यम ठरवून गृहीतके धरून वागतात आणि मग ठेस लागते.
👉🏻माणसं ही तुकड्या तुकड्यानी मोठी असतात.
👉🏻प्रत्येक जण एकदुसऱ्याला वापरून घेत असतो.
👉🏻यश पैसा आला म्हणून निव्वळ मस्तीत राहू नका.

जीवनाच्या चक्रीवादळात सापडून एका माणसाच्या मनाची जी उलाघाल झाली त्याची ही हकीकत.... एकवेळ वाचून, समजून घ्यावी त्याने आपलं शहाणपण वाढेल.

_सिद्धेश्वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...