मुख्य सामग्रीवर वगळा

रंगात रंगालो मी - चित्तरंजन कोल्हटकर

रंगात रंगालो मी - चित्तरंजन कोल्हटकर 




शास्त्रीय संगीत ऐकणारा एक विशिष्ट वर्ग असतो तसंच नाटक पाहयला जाणारा ही एक विशिष्ट वर्ग असतो. या वर्गाला सावरकरांचं,संघाचं आकर्षण असतं. बोलायला, लेखणी चालवायला हा वर्ग खूप हुशार असतो. हा वर्ग संधी मिळेल तिथे संघी विचारांचं, नेत्यांच उदात्तीकारण करतो. हे अनुभवकथन ही याला अपवाद नाही.असो...

चित्तरंजन कोल्हटकर यांना वडिलांकडून नाटकाचा वारसा मिळाला. बालपणापासूनच ते नाटक चित्रपट यामध्ये कामं करू लागले. वडील चिंतामण कोल्हटकर यांची दीनानाथ मंगेशकर यांच्या बरोबर बळवंत संगीत कंपनी मध्ये भागीदारी होती. ही कंपनी नाटक काढायची. काळ बदलला. बोलपट, मूकपट आले. नाटक मागे पडू लागले. चिंतामण यांनी नाटक कंपनी बंद करून सिनेमा निर्मिती सुरू केली. आयुष्याची जमापुंजी लावली पण अपयश आले. देणेकरी दारापर्यंत आले. फरार व्हावं लागल. आर्थिक मानसिकरित्या कुटुंबाची कंपनीचीं वाताहत झाली. आठ नऊ वर्षाचा चित्तरंजन हे सर्व पाहत होता अनुभवत होता.

आपल्या मुलांनी नाट्य व्यवसायात न येता इतर काहीतरी करावं अशी चिंतामणराव यांची इच्छा होती, पण मुलगा चित्तरंजन याच्यावर कळत नकळत कलेचे संस्कार झाले होते. तो नाट्य आणि सिनेमा क्षेत्रात आला. पैसा आणि नाव कमावलं. 60-65 वर्षे कलेच्या क्षेत्रात कामं केलं. यासंबंधीचे अनुभव पुस्तकात आहेत. नाटकाची आवड असणाऱ्या, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी हे अनुभव जरूर वाचावे.

चित्तरंजन कोल्हटकर यांची काही नाटके -
अश्रूंचीं झाली फुले, देवमाणूस, मुद्राराक्षस, रायगडचा राजबंदी.....
💡मनातलं 

सामान्य माणूस चित्रपट पाहायला कधीतरी थेटरला जातो.पण नाटक पाहायला जात नाही असा माझा अनुभव आहे. सिनेमाचा ट्रेलर येतो तसं नाटकाचा ट्रेलर पाहण्यात आल्यावर यात फरक पडेल का?

घरी लग्नकार्य असेल किंवा इतर कोणता कार्यक्रम असेल तर किती धावपळ होते. नाट्य निर्माते, अभिनेते ही धावपळ कायमच करतात. किती ताण येत असेल त्यांना?
तिकीट विक्री होईल का नाही?
प्रेक्षक प्रतिसाद देतील की नाही?
सर्व नाट्यकर्मी वेळेत येतील की नाही?
आपलं नाटक चालेल की नाही?

वेळी अवेळी जेवण, रात्रीचे उशिरापर्यंत चालणारे प्रयोग, तालीमी करून आवाज बसणार नाही याची काळजी घेणे, तेलकट वा थंड न खाणे. नाट्य कलाकार आणि निर्माते यांचीं जिद्द, हुरहुन्नरी वृत्ती मला अचंबित करते.

नुकताचं मी The kiran mane show पाहिला. निर्माता त्याची कलाकृती सादर करतो. त्याचे कष्ट, धाडस याची जाणीव झाली. प्रत्यक्ष डोळ्यांसमोर कलाकाराला अभिनय करताना पाहणं, संगीत, लाईट याचा अनुभव घेणं..... अद्भुत आंनद देणारं होतं. सिनेमा पाहण्यात ही मजा नाही.

नाटक पाहायला जात राहिलं पाहिजे.

_सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...