बहुत दूर,कितना दूर होता है- मानव कौल (030824)
"मैं बहुत पहले ठोकर खाकर गिर चुका था…
जो बाद में उठकर भागा, वो मैं नहीं था।"
माझ्या आयुष्यातील पहिलं हिंदी पुस्तक, जे मी पूर्ण वाचलं आणि मला फार आवडल.
पुस्तकाच्या मुखपृष्ठवर, एक चिमणी एका काडीवर बसली आहे, मान वर करून अथांग निळ्या आकाशाचा वेध घेत आहे. या मुखपृष्ठांमुळे की पुस्तकाच्या शीर्षकामुळे पुस्तकाकडे आकर्षित झालो माहित नाही. किंवा Algorithm ची कमाल असेल एक नवीन लेखक समजला.
लेखक मानव कौल फ्रान्समध्ये एकट्याने फिरत आहेत. त्यांना भेटणारी माणसं,शहरं, त्यांच्या मनात उठणारे विचारांचे तरंग , मनाची द्विधा अवस्था हे या प्रवास वर्णनात आहे.
मनात उठणाऱ्या भावना नेमक्या शब्दात पकडणं फार अवघड काम आहे याचा अनुभव मी घेतोय. काही भावना या अशा असतात की ज्या अनुभवता येतात त्याला शब्दरूप द्यायला गेलो की बरेच काही निसटून जातं. या प्रवास वर्णना विषयी लिहिताना असचं झालंय.
जीवन अनिश्चित आहे, कॅफे,शहर,पुस्तक, तो, ती कितीही आवडली/ला तरी त्याची अखेर होणार आहे. मानवी जीवनात काहीच कायमस्वरूपी नाहीये, हे दुःखद नसून यातच जीवनाच सौंदर्य समावलं आहे.
कामू म्हणतो त्याप्रमाणे जीवनाचा अर्थ शोधन व्यर्थ आहे कारण Life is meaningless, जीवन असंगत (absurd )आहे. प्रत्येक क्षण सजगतेने (mindfulness )जगणे हाच उपाय आहे.
" हे ही दिवस जातील "_ आपण हे बरेचदा ऐकलं असेल, वाचलं असेल पण समजलं का? याची समज आपल्या खोल अंतकरणात करून देणारं हे प्रवासवर्णन फार उशीर होण्याआधी वाचा.
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा