धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा -गोविंद पानसरे (211224)
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला होता, तो का केला हे या पुस्तकाच्या वाचनाने समजतं.
गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव व्हावी, वर्गविहीन समाज निर्माण व्हावा यासाठी ते कार्य करत होते. ते नुसतेच विचारवंत नव्हते तर कृतिशील ही होते त्यामुळे प्रस्थापितांना, मनुवाद्यांना त्यांच्यापासून धोका वाटला. कुठलाही चान्स घ्यायला नको म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.
उत्पादन साधनांची मालकी असणारा एक वर्ग आणि तिथे राबून, काबाड कष्ट करून संसाधनांची मालकी असणाऱ्याला पैसा मिळवून देणारा एक वर्ग आहे.
संसाधनांची मालकी असणारा मुठभर वर्ग स्वतः श्रम करत नाही. आयतं खाणारा हा वर्ग अतिरिक्त पैशाच्या जोरावर देशाची धोरणं ठरवू लागतो. यात सामान्य जनतेचे हित नसते.( भारतीय सैन्य दलासाठी आणलेली अग्नीवर योजना आठवा.)
आहे त्या व्यवस्थेत सामाजिक न्याय मागणं म्हणजे या व्यवस्थेचे(भांडवलशाही चे ) मरण पुढे ढकलणं आहे, समाज बदलाची मागणी व्हायला पाहिजे, त्यासाठी क्रांती, संघर्ष अपरिहार्य आहे. भांडवलदार वर्ग नष्ट व्हावा हे कम्युनिस्टंना अपेक्षित आहे.
समजा
आपण गृहीत धरू कॉम्रेड पानसरे यांना अपेक्षित असलेला वर्ग विहीन समाज अस्तित्वात आलाय
मग काही प्रश्न
👉🏻 उत्पादन संसाधनांची मालकी सरकारची राहीली तर कार्यक्षमता वाढते का?
👉🏻 कारखानदारी सरकारी नोकरशाहीच्या अधिपत्याखाली आली तर दर्जात्मक फरक पडत नाही का?
एअर इंडिया,बीएसएनएल, महावितरण च काय झालं?
👉🏻 नोकरशाही बलवान होऊन उद्यमशीलता मारली जाणार नाही का?
👉🏻 खाजगी उद्योगांना नाकारून संधीची समानता या भारतीय राज्यघटनेतील तत्त्वाला बाधा येणार नाही का?
👉🏻चीन, रशिया, क्युबा अपयशी का ठरले? चीन ने तर साम्यवाद कधीच सोडून दिलाय असं का?
वर्गवीहीन समाज अस्तित्वात येणं हे मृगजळ आहे. कधीही प्रत्यक्षात येऊ न शकणार स्वप्न, कल्पना आहे.
मग आपण करावं तरी काय?
आपण सामान्य जनतेचे प्रबोधन करत राहिले पाहिजे. भांडवलदारांचा एक वर्ग असतो, ते एकत्र येऊन त्यांच्या हिताची धोरणं ठरवतात.ती अंमलात आणावीत यासाठी सरकारवर दबाव आणतात.
( भारतात कॉर्पोरेट टॅक्स 30 वरून 22 टक्क्यांवर आणला आहे. मागील दहा वर्षात बारा लाख कोटी रुपये कर्ज उद्योगपतींना माफ केल आहे.)
सामान्य जनतेला देश, धर्म, राष्ट्रवाद,जात, यात गुंतवून ठेवलं जातं.
आपले सगळे प्रश्न आर्थिक आहेत याची जाणीव बहुजनांना करून देणे हीच कॉम्रेड गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली ठरेल.
(बहुजन कोण?
ज्याच्याकडे विद्याबळ, द्रव्यबळ,अधिकारबळ नाही तो इसम, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो बहुजन आहे.)
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा