मानव विजय - शरद बेडेकर
धर्म ईश्वर चिकित्सेकडून निरीश्वरवादाकडे (050325)
मनातील पूर्वग्रह, लहानपणापासून झालेली कंडिशनिंग बाजूला सारून शरद बेडेकर लिखित मानव विजय पुस्तक वाचल्यास जीवनात क्रांती होईल.
आपल्या मध्ये आत्मा आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. मोक्ष मिळवण म्हणजे जन्म मृत्यू च्या चक्रातून मुक्त होऊन परमात्म्यात विलीन होणं आहे. असा भडीमार लहानपणापासून आपल्यावर होतं आला आहे.
हत्तीच्या लहान पिल्लाला साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं, त्याचं कंडिशनिंग होतं की ही साखळी आपण तोडू शकत नाही. तो हत्ती मोठा होऊन देखील त्याच मानसिक गुलामगिरीत, साखळदंडाने बांधलेले पाय या अवस्थेत जगतो.
मृत्यू नंतर काय या विचाराने माणूस निराश, हतबल होऊ नये म्हणून मोक्ष, पुनर्जन्म ही कल्पना आली. मृत्यू नंतरच्या जीवनाची आस बाळगून नानाविध कर्मकांड, विधी करायला सांगितले जातात.
मानवी जीवनात अन्याय, दुःख, पीडा का आहे? यावर सोपं उत्तर पूर्वजन्मच पाप वा संचित असं सांगितलं जातं.
ख्रिश्चन मुस्लिम या धर्मात पुनर्जन्माची कल्पना नाही, तिथे मानवी जीवनातील व्यथांना सैतान वा इब्लीस कारणीभूत असतो अशी कल्पना मांडण्यात आली आहे.
महात्मा फुले यांनी निर्मिकाची कल्पना मांडली. निर्मिक आहे पण आपण त्याची पूजा, स्तुती केल्याने वा ना केल्याने आपल्यावर नाराज व्हायला तो काही तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी नाही.
नारायण नागबळी, पिंडदान, सत्यनारायण, अथर्वशीर्ष चे सामूहिक पठण, हरीनाम सप्ताह केल्याने, कोणत्याही मठात जाऊन नवस केल्याने वा न केल्याने निर्मिक ला काहिही फरक पडतं नाही.
परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप हे सूत्र मनाशी ठेऊन आपलं दैनंदिन जीवन अधिक सुखकर व आनंदी करणं हीच खरं निर्मिकाची भक्ती आहे. त्यासाठी कुठल्याही मंदिरात, मठात, तीर्थक्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही.
मनुष्य जन्म एकदाच आहे. वेळ मौल्यवान आहे.निर्मिक असला तरी पुनर्जन्म, आत्मा, परमात्मा, दैवी कृपा/ अवकृपा असं काही नसतं. स्व कर्तृतवावर विश्वास ठेऊन जीवनातील संघर्षाला सामोरे जायच.
(श्याम मानव, नरेंद्र दाभोळकर, प्रा य ना वालावलकर, रिचर्ड डॉकिन्स, सुनील दांडेकर आणि अ हा साळुंखे यांची पुस्तके सुद्धा वाचावीत.)
_ सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा