मुख्य सामग्रीवर वगळा

परिवर्तनाच्या वाटेवरील काटे - प्रा. चंद्रसेन टिळेकर

परिवर्तनाच्या वाटेवरील काटे - प्रा. चंद्रसेन टिळेकर (120524)



परिवर्तन अटळ आहे, ते होत असताना संघर्ष होणं हे ही अटळ आहे. 

जीवावर उदार होऊन समाजसुधारकांनी धर्म चिकिस्या केली, समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवला. धर्माच्या नावानं अज्ञान निर्माण करून आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण केलं जात. यावर ज्यांची पोटं भरतात ते प्रतिगामी,धर्म धोक्यात आला अशी हाकाटी देऊन सुधारणा थोपवून धरण्याचा प्रयत्न करतात.

सत्यनारायण पूजा, नारायण नागबळी, ज्योतिष(शास्त्र नव्हे श्रद्धा ),वास्तू (शास्त्र नव्हे श्रद्धा ) याला नसलेला धार्मिक आधार शोधून बेरकी, लबाड लोकं सर्वसामान्यांचं शोषण करतात.

17 वैचारिक लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. या लेखाचे वाचन, मनन आपल्या मनात विवेक निर्माण करते. 

फुले,शाहू,आंबेडकर,आगरकर, रानडे,कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे या धुरीणांनी समाजसुधारणेचा रथ निर्माण केला,गतिमान केला हा रथ अव्याहत गतिमान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची.... वाचन, मनन करून कृतिप्रवण होऊन परिवर्तनाचे वाटसरू बनू.

डॉ विजय भाटकर यांनी प्लांचिट चे समर्थन केले. ज्योतिष ला शास्त्र म्हटले. श्री दवे हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, त्यांच्या मते रामायण महाभारत याचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा. सनातनी (मनुवादी ) च्या मते महात्मा फुले ब्राह्मण द्वेष्टे होते या सर्व बाबींचा अभ्यासपूर्ण समाचार या पुस्तकात घेतला आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ मार्मिक आहे.

(पुस्तक नक्की वाचावे.)

जय शिवराय, जय भीम, जय हिंद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...