परिवर्तनाच्या वाटेवरील काटे - प्रा. चंद्रसेन टिळेकर (120524)
परिवर्तन अटळ आहे, ते होत असताना संघर्ष होणं हे ही अटळ आहे.
जीवावर उदार होऊन समाजसुधारकांनी धर्म चिकिस्या केली, समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवला. धर्माच्या नावानं अज्ञान निर्माण करून आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण केलं जात. यावर ज्यांची पोटं भरतात ते प्रतिगामी,धर्म धोक्यात आला अशी हाकाटी देऊन सुधारणा थोपवून धरण्याचा प्रयत्न करतात.
सत्यनारायण पूजा, नारायण नागबळी, ज्योतिष(शास्त्र नव्हे श्रद्धा ),वास्तू (शास्त्र नव्हे श्रद्धा ) याला नसलेला धार्मिक आधार शोधून बेरकी, लबाड लोकं सर्वसामान्यांचं शोषण करतात.
17 वैचारिक लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. या लेखाचे वाचन, मनन आपल्या मनात विवेक निर्माण करते.
फुले,शाहू,आंबेडकर,आगरकर, रानडे,कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे या धुरीणांनी समाजसुधारणेचा रथ निर्माण केला,गतिमान केला हा रथ अव्याहत गतिमान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची.... वाचन, मनन करून कृतिप्रवण होऊन परिवर्तनाचे वाटसरू बनू.
डॉ विजय भाटकर यांनी प्लांचिट चे समर्थन केले. ज्योतिष ला शास्त्र म्हटले. श्री दवे हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, त्यांच्या मते रामायण महाभारत याचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा. सनातनी (मनुवादी ) च्या मते महात्मा फुले ब्राह्मण द्वेष्टे होते या सर्व बाबींचा अभ्यासपूर्ण समाचार या पुस्तकात घेतला आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ मार्मिक आहे.
(पुस्तक नक्की वाचावे.)
जय शिवराय, जय भीम, जय हिंद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा