मुख्य सामग्रीवर वगळा

इच्छामरण - सौ संगीता भारत लोटे

इच्छामरण - सौ संगीता भारत लोटे (140425)



ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चुकीच्या कारणामुळे प्रकाश झोतात आलं. चुकीचे निदान आणि उपचार यामुळे शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टर भारत लोटे यांच्याही मृत्यू ला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जबाबदार आहे असा दावा त्यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी केला. याविषयी त्यांनी " इच्छामरण एक सत्यकथा " हे पुस्तक लिहिलं.

हे पुस्तक 286 पानांचं आहे. त्यातील पहिली 209 पान त्यांच्या बालपणीच्या आठवणी, विवाह, प्रेम, कौटुंबिक जीवन व अडचणी याचं वर्णन आहे.(नाही वाचली तरी चालतील.) संगीता लोटे या नॅशनल लेवलच्या खो खो खेळाडू होत्या, कमी वयात झालेलं लग्न आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या यात एक खेळाडू संपून गेला. 
बालपणीच्या रम्य आठवणी, अडचणी, संघर्षातून केलेली प्रगती हे शंभरातील 99 जणांना सांगावसं वाटतं.(पण लिहिण्याची हातोटी ठराविक जणांकडे असते त्यामुळे वाचक बचावतात.)

डॉ भारत लोटे यांचं अचानक पोटं दुखू लागलं, तीन दिवसानंतर ही त्रास कमी न झाल्याने सोनोग्राफी केली, तिथल्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सिटीस्कॅन केला. सिटीस्कॅन मध्ये स्वादुपिंडावर काळा डाग दिसला. 

दीनानाथ मंगेशकर मधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्जरी करणे आवश्यक होते.अन्यथा कॅन्सर होऊ शकतो. त्यांनी सर्व व्यवस्थित होईल याची 200% खात्री दिली. सर्जरी करून त्यांनी अर्ध स्वादुपिंड कापून काढलं. या ऑपरेशनला 12 तास लागले कारण स्वादुपिंड बिळबिळीत झालं होतं,टाके घालता येत नव्हते असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं.

आतली जखम हीलिंग होतं नाही म्हणून तीन दिवसांनी पुन्हा सर्जरी करण्यात आली. ऑपरेशन रि ओपन करून पूर्ण स्वादुपिंड काढण्यात आलं.

( सुरुवातीला ऑपरेशन झाले तेव्हाच स्वादुपिंड बुळबुळीत असल्याने ते जुळले जात नव्हते तेव्हाच ते पूर्ण काढलं असतं तर पुढचे सगळे प्रॉब्लेम आलेच नसते असं पेशंटच्या पत्नीचे म्हणणं आहे.

पेशंट ला आयुष्यभर इन्सुलिन घ्यायला लागू नये या विचारातून डॉक्टर ने आधी पूर्ण स्वदुपिंड काढले नसावे.)

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना चौदाव्या दिवशी पेशंटला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, 'तो' डॉक्टर बाहेर गेला होता म्हणून असिस्टंट डॉक्टरने पूर्वीच झालेल ऑपरेशन पुन्हा रिओओपन केलं, (3 वेळा)आतड्याला छिद्र झाल आहे असं सांगण्यात आलं.
(डॉक्टरचं नाव वैयक्तिक रित्या मेसेज करून विचारू शकता.)

त्यानंतर ही पेशंटला उलट झाल्या, एकदा उलटी केल्यानंतर त्यातून प्लास्टिकची छोटी रिंग बाहेर पडली, पेशंटच्या पत्नीचे म्हणणं आहे डॉक्टरने हलगर्जीपणा केलेला आहे तर ICU तील डॉक्टरांचे म्हणणं आहे की ती रिंग पॉटमध्ये आधीच असेल.

डॉ भारत लोटे 29/03/2017 रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले, 19/07/2017 रोजी त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आणि प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार रुग्णालयाने अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे, चुकीची ट्रीटमेंट दिली आहे. ( याबाबत हॉस्पिटलचे म्हणणं काय हे अप्रकाशित आहे.)

( संगीता लोटे यांनी सेकंड ओपिनियन घेतलं होतं, कोणत्याही सर्जरीची अजिबात आवश्यकता नाही असं त्यांना सांगण्यात आलं होतं. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरने भीती घातली, कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली आणि सर्जरी 200% यशस्वी होईल अशी हमी दिली. त्यामुळे सर्जरी करण्याला परवानगी देण्यात आली. )

पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे सौ संगीता भारत लोटे यांनी स्वतःला विकण्याचीही तयारी दाखवली होती, शिवाय मुलगा प्रतीक याला स्वतःची किडनी विकण्याची परवानगी दिली होती. ( शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून पंचवीस वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांची ही स्थिती असेल तर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या, कुठलेही विमा कवच नसलेल्या अभागी जीवांच काय होतं असेल? )

💡 बऱ्याचदा माणूस हतबल झाला की त्याचा विवेक हरवतो आणि तो करून पाहिला काय हरकत आहे? असं म्हणून कर्मकांड करतो, याला अपवाद संगीता लोटे ताई व इतर प्रियजण सुद्धा नाहीत.

त्यांनी 

1)संतोषी मातेचे कडक उपास केले, मातेकडे जाऊन आर्जवं केली.

2) स्वामी समर्थ मठात जाऊन तासंतास करुणा भाकली. बरे झाल्यानंतर मठात सेवा देऊ असेही नवस बोलले.

3) अमावस्येला रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दिवे लावले.

4) भटजीच्या सांगण्यानुसार गव्हाच्या पिठाचे दिवे करून त्यात तूप घालून अमावस्येला रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली ते दिवे लावले.

5) देव पाण्यात ठेवले.

6)मिठ मोहरी उतरून नजर काढली.

7)अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठात अन्नदानासाठी 50 हजार रुपये द्या आणि मला पावती दाखवा असा पेशंटने आग्रह धरला.
ट्रीटमेंटच्या खर्चामुळे आपले कुटुंबीय हतबल झाले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती.

( दवाखान्याचा दररोजचा खर्च 40 ते 50 हजार रुपये होता.)
(29/03/2017 - 19/07/2017 - 112 दिवस पेशंट ऍडमिट होता.)

पूर्वी कधी त्यांनी पाच हजार रुपये देणगी मठाला दिली होती, तीच पावती एडिट करून 50 हजार रुपये देणगी मठाला दिली असं त्यांना दाखवण्यात आलं. 

पेशंटला आर्थिक स्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी इच्छा मरण मागितले. मग शासकीय स्तरावरून मदतीची हालचाल झाली. तोपर्यंत फार उशीर झाला होता.

" इच्छा मरण एक सत्यकथा " हे पुस्तक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवत.(संतोष घोंगडे यांनी केलेलं मुखपृष्ट लाजवाब आहे.)

(महाराष्ट्र शासनाचा "डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार" हा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांना दिला जातो. हा पुरस्कार डॉ भारत लोटे यांना राजापूर तालुक्यातील ओणी PHC साठी मिळाला होता.)

👉🏻 दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे पाच लाख रुपये देणे बाकी होतं त्यामुळे ते डेड बॉडी देत नव्हते. मंत्रालयातील अधिकारी ओम प्रकाश शेटे यांनी फोन केल्यामुळे नातेवाईकांच्या ताब्यात बॉडी देण्यात आली.
मंगेशकर रुग्णालयाने राहिलेल्या पैशांसाठी फोन केला असता 5 लाख काय 50 लाख देऊ तुम्ही आमचा माणूस द्या असं नातेवाईक म्हणाले.( दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांचे पैसे मिळाले नसावेत. )

तनिषा भिसे यांच्यासाठीही मंत्रालयातून फोन आला होता पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने हालचाल केली नाही.... वरील किस्सा माहित झाल्याने केवळ त्या प्रशासनाला दोष द्यावा वाटतं नाही. ही व्यवस्था जबाबदार आहे आणि अशा व्यवस्थेला निर्माण करण्यात मतदान न करणारे, जात धर्म स्वार्थ पाहुन, पैसे दारू घेऊन मतदान करणारे जबाबदार आहेत.

तूर्तास इतकंच...

मंगेशकर कुटुंबीय, धनूभाऊ केळकर आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या अनितिमान वर्तुणुकीविषयी पुन्हा कधीतरी.....

_सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...