मुख्य सामग्रीवर वगळा

ठगाची जबानी - मेडोज टेलर (प्रा. वा. शी. आपटे )

ठगाची जबानी - मेडोज टेलर (प्रा. वा. शी. आपटे )



भारतात 36 वर्षे ब्रिटिश अधिकारी म्हणून काम करताना मेडोज टेलर याला ठगांबद्दल जे अनुभव आले त्याला कादंबरी स्वरूप देऊन "ठगाची जबानी" लिहिले आहे.
पूर्वी प्रवास करायचा म्हणजे दिव्य होतं. घोडा, तट्टू, बैलगाडी, पायी असा प्रवास केला जायचा. तो प्रवास काही दिवस, आठवडे, महिने चालायचा. दूरच्या प्रदेशात, निबीड अरण्यात, अनोळखी लोकात - मुलखात प्रवस करणं धोकादायक होतं. चोर, लुटारू, ठग, दरोडेखोर यांची भीती असायची.

सावज हेरून त्यांच्याबरोबर प्रवासाला सुरुवात करायची, त्यांचा पूर्ण विश्वास संपादित करायचा आणि बेसावध क्षणी परवलीचा शब्द उच्चारून सर्वाना फास लावायचा, नंतर कपड्यांनीशी सर्व ऐवज घ्यायचा आणि प्रेतांची पोटं फाडून ती गाडायची ही ठगांची कार्यप्रणाली होती.

ही देवीने दिलेली जबाबदारी आहे अशी ठगांची श्रद्धा होती. महिला, लहान मुलं कोणालाही ते दया दाखवत नव्हते.

अमर अली हा ठग त्याचा जीवनावृत्तांत या कादंबरीतून सांगतो. विधिनिषेध न पाळणाऱ्या या ठगांना काही प्रमाणात संस्थानीकांची ही साथ होती, लुटीतील काही वाटा त्यांना मिळायचा.

जय काली, लगावं पान, भिलामांजे (खड्डे खणून झाले ) यासारखे त्यांचे परवलीचे शब्द होते हे उच्चारले की निमिषार्धात त्यांच्या रुमालाचा विळखा प्रवाशाच्या मानेस पडून त्याला फास दिला जायचा.

ठग आणि पेंढारी यांची वृत्ती पाहिली की वाटतं बरं झालं ब्रिटिश भारतात आले. त्यांनी कायद्याचं राज्य आणलं, ठग आणि पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला.

(समकालीन जीवनाची कल्पना येण्यासाठी एकवेळ जरूर वाचावी "ठगाची जबानी ")

💡पुस्तकातील उतारे 

👉🏻वरून साजरे दिसावे पण थापा मारून लोकांना फसवावे, काहीही सोंग घेतले तरी ते शेवटपर्यंत निभावून न्यावे. भाषण गोड असावे. अंगी लीनता असावी. वागण्यात चपळपणा असावा तरच सोद्याचे काम जमते. आमच्यातला बद्रीनाथ एक उत्तम सोदा होता. तो म्हणे, ‘ज्या कुणावर माझी नजर गेली, व ज्या कुणाला मी गंडवायचे असे ठरवीन, तो माझ्या हातून निसटला असे कधी घडलेच नाही.’

👉🏻स्त्री-सौंदर्याच्या आहारी जाऊन आजपर्यंत कित्येकांनी आपली कर्तबगारी अशीच फुकट घालवली आहे. या स्त्रिया दिसतात तशा नसतात !’

👉🏻बुनीज म्हणजे ज्याला आम्ही ठगीने मारला त्याचे भूत.

👉🏻अशा प्रकारे ‘वध’ करणार्‍या खुन्याचे, मारेकर्‍याचे मन त्याला नेहमी खात राहातं. त्याची मन:शांती ढळून जाते. ती व्यक्ती केव्हा ना केव्हा आपल्या कृत्याबद्दल पश्‍चात्ताप करते. पण या ठगांचे काही वेगळेच आहे. त्यांना या मनुष्य हत्येचं कधी वाईट वाटत नाही.

👉🏻एकारी म्हणजे लांडगे किंवा कोल्हे विशिष्ट आवाजात अशुभ वाटेल अशा स्वरात रडतो त्याला एकारी म्हणतात.

👉🏻पुन्हा एकदा ससा माझ्या पायाजवळून आडवा गेला. अपशकून होता. तरी तो मानला नाही. माझे बनिज माझ्या पक्के हाती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...