मुख्य सामग्रीवर वगळा

नदिष्ट - मनोज बोरगावकर

नदिष्ट - मनोज बोरगावकर 



"तत्वमासी श्वेतकेतू"_ जे तत्व माझ्यात आहे तेच या सृष्टीच्या चराचरात सामावलं आहे, 'नदिष्ट' पुस्तक वाचल्यानंतर मन या जाणीवेने मौन होते.

संथ वाहणारी नदी, तिचा निर्मनुष्य काठ, झाडांची दाट गर्दी, अधिमधी दूर मंदिरात वाजणारी घंटा, आकाशात विहार करणारा पक्षांचा थवा आणि नदीच्या निर्मळ पाण्यात वेळेच भान हरपून मनसोक्त डुंबणारा मी, असं स्वप्न प्रत्यक्षात साकार व्हावं अशी इच्छा 'नदिष्ट ' मुळे होते.

आईच विस्तारित गर्भ म्हणजे नदी, आई निर्वतल्यावर नदीच्या डोहात आईची उब शोधणारे, निर्वाणीचा काळ जवळ आलाय हे उमजून नदीच्या तिरावर बसून गहिवरणारे दादाराव......
विचारांच्या तंद्रित हरवण्यासाठी एकांत शोधत गोदाकाठी आलेली सगुणा.....
सर्व बंध तोडून नि्रिछ झालेला भिकाजीं.....
मासे पकडणारा बामनवाड भोई....
रेल्वे रुळावर निनावी मेलेली सकीनाबी....
कालुभैय्या.... आणि लेखक हे सर्वजण न दिसणाऱ्या बंधाने नदीशी, एकमेकांशी, जगाशी जोडले गेले आहेत.

नदी वाहत असते कधी संथपणे, कधी उग्रपणे, आपण काठावर उभे राहून क्षण दोन क्षण त्या पाण्याचा सहवास अनुभवतो. पुन्हा काठावर येतो, नदी आपली तिच्या वेगाने वाहत असते.
आपलं आयुष्यही नदीप्रमाणे वाहतय, वाहतं पाणी जसं परत फिरून कधी येणार नाही तसंच जीवनात येणाऱ्या माणसांचही आहे.

पूर्वग्रह न बाळगता वागता यायला हवं कारण सगळंच क्षणभंगूर आहे.

पुस्तकात ऐके ठिकाणी सगुणा, भिकाजीं लेखकाचा कायमचा निरोप घेतात, आपण आयुष्यात पुन्हा कधीही भेटणार नाही याची जाणीव त्यांना असते. त्या क्षणी आपलाही कंठ दाटून येतो, हृदयात कालवाकालव होते.
पण....
तरीही हे तिघे भाग्यवान, यांना निरोपाचं बोलणं तरी करता आलं.

(लाईफ ऑफ पाय मधील पायला एकाएकी आईवडिलांचा निरोप घ्यावा लागतो, त्याला एकच खंत जन्मभर सतावत असते. तो म्हणतो "I suppose, in the end, the whole of life becomes an act of letting go. But what always hurts the most is not taking a moment to say goodbye. I was never able to thank my father for all I learnt from him. To tell him, without his lessons... I would have never survived.")

पुस्तक वाचल्यानंतर आपण काहीतरी खूप वेगाने गमावतोय असं वाटत राहतं, ते काय असेल बरं? 
दररोज नदीवर जाणाऱ्या संवेदनशील मनाचं, त्याच्या आठवणीचं, अनुभवाचं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं आपल्या प्रियजनांना भेट द्यावं.

_सिद्धेश्वर (300624)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...