मुख्य सामग्रीवर वगळा

आधार नसलेली माणसं - मित्तल पटेल

आधार नसलेली माणसं - मित्तल पटेल (201125)



मित्तल पटेल यांना सरकारी अधिकारी व्हायचं होतं. पत्रकारितेचा कोर्स करताना त्यांचा ऊसतोड कामगारांच्या जीवनाशी संबंध आला. त्या काही काळ कामगारांच्या पालावर राहिल्या. त्या अनुभवाने त्यांचे जीवन ध्येय बदललं. परिघा बाहेरच्या भटक्या जमातींच जगणं, त्यांचे प्रश्न शहरी लोकांसमोर,शासन व्यवस्थेसमोर आणण आणि त्यातून अपेक्षित परिणाम साधनं यासाठी त्या काम करतायेत.

डफेर (फिरस्ती) समाजाला मतदानाचा हक्क मिळवून देणं...
वाडिया गावातील महिलांना सन्मानाने जगण्याची संधी देणं....
बेघर लोकांना पक्क घर मिळावे यासाठी काम करणं....
शासन व्यवस्थेतील जाचक नियम भटक्या समाजासाठी पूरक करणं....आदी कामे त्या करतायेत.
अज्ञान दारिद्र्य यामुळे शोषितांना आवाज नसतो त्यांचा आवाज होण्याचं काम मित्तल पटेल या करतात.

अनवट वाट चालणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपून कर्तव्य भावनेने कार्य करणाऱ्या मित्तल बेन यांचे अनुभव कथन एक वेळ जरूर वाचावे.
कारण 
"सुखी माणसांनी दुखी माणसांची चिंता करायला हवी."
असा संदेश त्या कृतीतून देतात.

💡मनातलं 

आपण अडचणीत आलो तर सावरून घेणारी जीवाभावाची माणसं असण, त्यांनी आर्थिक मानसिक सहाय्य करण ही खूप मोठी जमेची बाजू आहे.
'कायमचा पत्ता' नसणारी माणसं आपल्या भोवतालच्या जगात वावरत आहेत. आठवडा पंधरा दिवसांनी त्यांचे बिऱ्हाड नवीन गावात स्थिरावत. थंडी ऊन पाऊस यापासून संरक्षण करणार पक्क घर यांना नसतं.
भटकंती करत जीवन जगणारी ही कुटुंब मुसळधार पावसात स्वयंपाकासाठी सरपाण कुठून आणत असतील? पावसात चिखलात चूल कुठे मांडत असतील? फिरस्तीवर असल्याने मुलांच्या शिक्षणाच काय? वैद्यकीय निकड भासली तर पैसे कुठून आणणार?

स्थिर आर्थिक उत्पन्न नसल्याने भटकंती करत जीवन जगावं लागण, त्यामुळे एक पत्ता नसण ही खूप वाईट गोष्ट आहे. परीगाबाहेरची ही लोकं अन्यायग्रस्त,अभावग्रस्त आहेत. याला समाजव्यवस्था जबाबदार आहे.
मी, तुम्ही, आपण सर्वांनी मिळून बनलेला समाज.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...