मुख्य सामग्रीवर वगळा

धर्म - प्रा य ना वालावलकर

धर्म



दहशतवादाचे मूळ धर्मात आहे. धार्मिक श्रद्धेत आहे. धर्माच्या नावे भावनिक आवाहन केले की, धार्मिकांची सारासार विचारशक्ती लुप्त होते. धर्मोन्माद चढलेल्या अशा श्रद्धाळूची झुंड धोकादायक असते; अविचारी कृत्ये करते, असे वारंवार दिसून आले आहे.

धर्मांमुळे माणसामाणसांत भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. आम्ही आणि ते असे तट पडले आहेत. प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटणे स्वाभाविक आहे. जगातल्या आजच्या समस्या अन्य धर्मीयांमुळे निर्माण झाल्या आहेत. जगातील सर्व लोकांनी आमचा सर्वश्रेष्ठ, महान पवित्र धर्म स्वीकारला की, विश्वशांती निर्माण होईल, सर्वत्र आबादी आबाद होईल असे प्रत्येक धार्मिकाला वाटते.

परंपरा, धर्मग्रंथ, श्रद्धा, भावना यावर धर्माचा डोलारा उभा असतो. त्यामुळे आपल्या धर्माचे तेवढे उत्कृष्ट, इतर धर्मांचे निष्कृष्ट अशी दृढ भावना प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या मनात असते. सर्व धर्म चांगले असा समभाव वरवर दिसत असला तरी वास्तव परिस्थिती काय ते सर्वजण जाणतात.

खोटे बोलू नये, कुणाची फसवणूक करू नये, कुणाला दुखवू नये, चोरी- लूटमारी करू नये, कुणावर अन्याय जबरदस्ती करू नये असे सर्वच धर्म सांगतात. पण जेव्हा दोन धार्मिक गटांमध्ये (समजा हिंदू-मुस्लिम) दंगल पेटते तेव्हा काय होते ते आठवा.

वरील सर्व धार्मिक उपदेश दोन्ही गट विसरतात. अन्य धर्मीयांच्या दुकानांतील माल लुटणे, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणे हेच धार्मिक कृत्य आहे, हीच धर्माची आज्ञा आहे, हेच देवाला आवडणारे असे दोन्ही धर्मीयांना वाटते. अशा गोष्टी अनैतिक आहेत, असे करण्यात काही चूक आहे, असे त्यांच्या मनातसुद्धा येत नाही. असे वाटते ते केवळ धार्मिक उन्माद चढलेल्या दंगलखोरांनाच नव्हे, तर दंगलीत प्रत्यक्ष सक्रिय सहभागी नसलेल्या सर्वच धार्मिक श्रद्धाळूना असेच वाटते. दोन्ही धर्मांतील लोक आपापल्या गटातील दंगलखोरांच्या हिंसक कृत्यांचे, अनैतिक अत्याचारांचे समर्थन करतात. परधर्मीयांची घरे जाळणाऱ्यांना आणि त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना ते शूरवीर म्हणून गौरवतात. त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळतात असा अनुभव दिसतो.

म्हणून सर्वधर्मसमभाव ही संकल्पना फोल आहे. असा समभाव सर्वबैच अशक्य आहे. एखाद्या हिंदूने एका मुसलमानाला वाचवले किंवा एखाद्या मुसलमानान दंगलीच्या वेळी एका हिंदू स्त्रीला संरक्षण दिले अशा एकदोन घटना घडत असतील; पण त्या अपवादात्मक.

म्हणून सर्वधर्म अभाव हवा. सर्व धर्म नष्ट होतील, सगळ्यांचा 'मानवता' हा एकच धर्म असेल तरच जगात शांतता, सुरक्षितता नांदू शकेल. नाहीतर धर्मांधांच्या हल्ल्याची तलवार कायमची टांगती राहील.

मानवता हाच खरा धर्म 

_प्रा य ना वालावलकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...