मुख्य सामग्रीवर वगळा

साद सागराची -पुरुषोत्तम गोखले

साद सागराची -पुरुषोत्तम गोखले 

ॲलिस्टर मॅक्लीन,आनंत सामंत यांच्या पुस्तकांमुळे समुद्र सफरीच आकर्षण निर्माण झालं. साद सागराची या शीर्षकाने पुस्तकाची साद घातली.

पुरुषोत्तम गोपाळ गोखले यांनी भारतीय नौदलात दहा वर्षे काम केलं.(1942-1952) त्यानंतर खाजगी शिपिंग कंपनीत काम करून 10 जून 1970 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाले. त्यांना सेवेत आलेले अनुभव या 125 पानात मांडले आहेत.
संरक्षण दलाच्या सेवेत जाण्याचा ध्यास गोखलेंनी घेतला होता. त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि ध्येय साध्य केलं. पोलीस सेवेत असणाऱ्या भावाची त्यांना मदत झाली.( सांस्कृतिक भांडवल असणं खूप महत्त्वाचं असतं.)

दुसरे महायुद्ध, नागरिकांचे बंड,भारताची फाळणी हे विषय येतात. गोखलेनीं हिंदू मुस्लिम ऐक्याचा कैवार घेतला आहे पण त्याचवेळी विनायक सावरकर यांचा उदो उदो उदोही केलाय. हा विरोधाभास आहे. जहाजावरील नोकरीमुळे त्यांना तत्कालीन राजकीय घडामोडींचा अभ्यास करता आला नसावा. असो 

नाविक दलात काम करणाऱ्याचे जीवन कसं असू शकतं याची कल्पना या अनुभव कथनातून येते. कौटुंबिक सुखाची तिलांजली द्यावी लागते. नवीन प्रदेश,नवीन माणसं भेटतात. पण कधीतरी यातील फोलपणा जाणवून घराची, आपल्या माणसांची ओढ वाटत असेल ना?

कोलंबस,सिंदबाद, वास्को-द-गामा, मार्को पोलो यांनी लग्न केले असेल का असा प्रश्न मनात येतो?

स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करायचा झाल्यास त्याग करावाच लागतो.

जन्मलो, संघर्ष केला, नोकरी मिळवली,लग्न केलं, सेवानिवृत्त होऊन एक दिवशी मरून गेलो. अशा प्रकारची चरित्र आत्मचरित्र अनुभव कथन नको वाटतात. 

ज्या निर्णयामुळे आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली, अशा निर्णया मागची प्रेरणा, त्याचे परिणाम, वा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच आकलन होणार असल्यास अनुभव कथन वाचणे म्हणजे वेळ सत्कारणी लागण.

सामान्य नोकरदार माणसाकडे असे सांगण्यासारखं काय असतं? मुलं, त्यांचे शिक्षण, बायकोच्या गरजा, घर, एक चार चाकी यातच त्याच्या जीवनाची इतिश्री होऊन जाते. याच चाकोरीत जीवन घालवलेल असताना, वा सेवेत असताना ज्यांची हयात वरिष्ठांशी जुळवून घेण्यात, संस्थेच हित न पाहता स्वहित पाहण्यात गेलेली असते त्यांनी अनुभव कथन लिहिण्याच धाडस करून वाचकांचा छळ करू नये.

_सिद्धेश्वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...