Homebound
माणसं जन्माची कैदी असतात. भारतासारख्या देशात हे सत्य वारंवार अधोरेखित होतं. दलित मुस्लिम कुटुंबात जन्मला येणे म्हणजे अभावाचे जीवन जगणं झालं आहे. दलित मुस्लिम समाजाकडे संसाधने नाहीत. रोजंदारी करून चरितार्थ चालवावा लागतो. यातही प्रामाणिक कष्टाचे मोल मिळत नाही.
चंदन शोएब या दोन तरुणांची कथा,मानसिक अवस्था चित्रपटात दाखवली आहे. चंदनच्या आईला स्वयंपाक तीन म्हणून मिळालेलं काम दलित असल्याने सोडावं लागलं. पोलीस दलात कॉन्स्टेबल होण्याचं चंदन शोएब यांचं स्वप्न भंगल. परिस्थितीमुळे हे दोघे कॉलेज शिक्षण घेऊ शकत नाही. दूरच्या शहरात कपड्याच्या मिल मध्ये कामासाठी जावे लागते.
चंदन ला सिमेंटच पक्का घर बांधायचा आहे. शोएबला वडिलांचं knee replacement चं ऑपरेशन करायचा आहे. दलित मुस्लिम असल्याने त्यांना समाजाच्या पूर्वग्रह दूषित मानसिकतेचा सामना करावा लागत असतो. समाजाचं भीषण वास्तव या चित्रपटात मांडलं आहे.
हिणवणारा नसतो तोपर्यंत हिण पण नसतं.
पात्रता असताना ही नाकारलं जाणं, काहीही चूक नसताना जात-धर्मावरून टोमणे मिळणं, यामुळे होणारी मनाची घालमेल चित्रपटात दाखवली आहे. मन विदिर्ण करणारा, समाज वास्तव मांडणारा अनुभव या चित्रपटातून येतो.
सर्व जाती-धर्माची माणसे ही एकाच वैश्विक शक्तीची निर्मिती आहे. तिथे पोहोचण्याचे मार्ग भिन्न असले तरी गंतव्य स्थान एकच आहे. साने गुरुजींच्या शब्दात सांगायचे तर " खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे "
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा