मुख्य सामग्रीवर वगळा

तर्कीष्ट - संपादन : प्राजक्ता अतुल (मधुश्री पब्लिकेशन )

हत्तीचं पिल्लू लहान असताना त्याच्या पायांना मजबूत साखळदंडांनी बांधलं जातं. ते पिल्लू धडपडतं, प्रयत्न करत पण साखळदंड तोडू शकत नाही. त्या पिल्लाचं बलदंड हत्तीत रूपांतर झाल्यावरही ते साखळदंड तोडत नाही. मनाची धरणा त्याला माहुताच्या तालावर नाचवते. चुकीच्या धरणेमूळ हत्ती गुलामीत खितपत पडतो.

बालपणापासून देव धर्म याबाबत आपल्याही धारणा कृत्रिम रित्या तयार केल्या जातात. हत्तीच्या पिलाप्रमाणे आपली गत होते. 

आपल्या बंदिस्त विचारांचे साखळदंड तोडण्याचे काम "तर्कीष्ट" या पुस्तकातील लेख करतात. प्रत्येक घरात हे पुस्तक असावं त्याच वाचन व्हावं. अशी अशा व्यक्त करण्याशिवाय काय करता येईल???
वयाच्या अठरा वर्षे पर्यंत आपल्या मुलांवर कोणताही देवधर्म लादू नये. कळत्या वयात आल्यानंतर धर्मग्रंथ वाचून त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्यावा. त्यांना दिलेली ही सर्वोत्तम भेट असू शकते .

या पुस्तकाच्या वाचनानंतर माझ्या मनात एक काल्पनिक संवाद स्फूरलाय तो पुढे देत आहे.

(संवाद - शांताराम खंडेराव या दोन व्यक्ती मध्ये घडतोय.)


शांताराम - तो सगळीकडे आहे आणि तो सर्व काही पाहतोय....तुमची प्रार्थना,अडचणी, संघर्ष,संयम, कर्म आणि दिखावे सुद्धा.

खंडेराव - हो का? बरं मग....

शांताराम - तू त्याची आराधना, उपासना केली पाहिजे.

खंडेराव - म्हणजे काय केलं पाहिजे?

शांताराम - उपास, व्रतवैकल्ये, अभिषेक करायला पाहिजे. मठ मंदिर अशा ठिकाणी जाऊन प्रार्थना करायला पाहिजे.

खंडेराव - माझा विचार तुला लक्षात येईल का? जाऊदे राव तो विषय....

शांताराम - साल्या तू नास्तिक आहे ना??

खंडेराव - स्वार्थ साधण्यासाठी, फलप्राप्तीसाठी कोणाची हुजरेगिरी करायची हे मला जमत नाही. मग तो तुझा देव का असेना?

शांताराम - नीट बोल.

खंडेराव - कार्यालयातील वरिष्ठांची चापुलसी करून सवलती मिळवणे आणि तू म्हणतो तशी देवाची आराधना करून फलप्राप्तीची अशा बाळगणे यात फरक काय आहे?

शांताराम - देवाची आराधना केल्याने मानसिक शांती मिळते, समाधान मिळते, मन प्रसन्न होतं.

खंडेराव - यासाठी मी धावायला जातो. तुकाई टेकडीवर फिरायला जातो. मेहनत कसरत करून घाम निथळला की मला फार बरं वाटतं. 

शांताराम - ते तर ठीक आहे. पण देवाचा सुद्धा करावं लागतं. त्याने विशेष समाधान लागतं.

खंडेराव - झाडांच्या पानांची सळसळ, पक्षांचा आवाज, मावळतीला जाणारा सूर्य, निरव शांतता हे सर्व मला अंतर्मुख करतं. मन प्रसन्न होतं. शांत वाटतं. याने माझे समाधान होतं.

शांताराम - पुन्हा तेच.... देवळात मठात का येत नाहीस ते सांग.

खंडेराव - तिथला गोंगाट, अस्वच्छता, व्यावसायिक स्वरूप पाहून मला शिसारी येते. काय तर म्हणे अभिषेक करा,शांती करा, होम हवन करा, तुमच्या अडचणी दूर होतील.
असं कुठं असतं का?

शांताराम - तू केलं नाही तर तुला प्रचिती कशी येईल?

खंडेराव - या अशा गोष्टी केल्याने देव प्रसन्न होऊन माझ्या अडचणी दूर करेल का?

शांताराम - हो मग.

खंडेराव - नाही, असं होत नसतं. तुझ्या मनावर हे बिंबवलं आहे.

शांताराम - कोणी?

खंडेराव - देवाच्या नावाने धंदा मांडलाय त्यांनी आपल्याला चुकीचा धर्म शिकवलाय. नवसाला पावणारा देव अशा कांड्या पिकवण्यामागे त्यांचा धंदा असतो, आर्थिक लागेबंध असतात.

शांताराम - काहीतरीच तुझं 

खंडेराव - मित्रा बरीच माणसं आर्थिक विवंचनेने, शारीरिक व्याधींनी ग्रासलेली आहेत.त्यांच्या जीवनात असुरक्षितता आहे. भावनिक रित्या, मानसिकरित्या अस्थिर असलेली माणसं हेरून खोटा दिलासा दिला जातो.

शांताराम - हतबल व्यक्तीला दिलासा तर मिळतो ना?

खंडेराव - खोटा दिलासा घेणं म्हणजे वस्तुस्थिती पासून पळ काढणे आहे. असा दिलासा काही व्यक्तींना दारू सेवनाने मिळू शकतो मग दारू प्यायला प्रोत्साहन द्यायचे का?

शांताराम - व्यवसाय चालत नाही, मुलीचे लग्न जमत नाही, असह्य व्याधी आहेत..... अशा असंख्य अडचणींच निराकरण करून घेण्यासाठी लोक मठात जातात. इतके सर्व लोक वेडे आहेत का?

खंडेराव - बिचारे हतबल झालेले असतात. करून पाहायला काय हरकत आहे असं म्हणून जातात.

शांताराम - पण बऱ्याच जणांना प्रचिती येते ना?

खंडेराव - ठराविक गोष्टी हायलाईट केल्या जातात. असा कोणताही ऑथेंटिक डाटा उपलब्ध होऊ शकत नाही.
"आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून "

शांताराम - तू धर्मद्रोही हेकेखोर आहेस.

खंडेराव - मित्रा, सहमत नसलो तरी तुझ्या मताचा आधार आहे.
 जगात कोणतीही गोष्ट कार्यकारण भावा शिवाय घडत नाही. चमत्कार नसतो. तसा दावा करणारे भामटे असतात. या शाश्वत सत्याची प्रचिती मी घेतली आहे. तारतम्य ठेवून विचार केल्यास तुलाही येईल.

अशोक खरात, बाबा राम रहीम, आसाराम बापू, बागेश्वर बाबा, अनिरुद्ध बापू, तथाकथित स्वामी, महाराज..... यांनी असं कोणतं तत्त्वज्ञान दिलं आहे? हात चलाखी करतात, भोळे भाबडे भक्त बोंब मारतात आणि या प्रवृत्तीचा बोलबाला होत राहतो.

तू विचार कर तर्क लाव.

शांताराम - तर्क नको लावू. भक्ती भावाने श्रद्धा ठेव. तुला प्रचिती येईल.

खंडेराव - Doubt is the origin of wisdom. शंका घेणे ही शहाणपणाची सुरुवात आहे असं रेने देकार्ट सांगून गेलाय.

क्रिटिकल थिंकिंग ही गोष्ट शिकावी लागते. आपल्या धरणांवर प्रश्न उपस्थित करून त्या तावून सलाखून घेतल्या पाहिजेत.

शांताराम - मी MCS आहे. क्रिटिकल थिंकिंग च्या बाता मला काय करतोस?

खंडेराव - शिक्षण आणि क्रिटिकल थिंकिंग याचा फारसा संबंध नसतो.

शांताराम - आला मोठा शहाणा...

खंडेराव - कुटुंब समाज टीव्ही.... इत्यादी माध्यमातून बालपणापासून आपल्या मनाचे कंडिशनिंग होतं राहतं. त्या धारणा पक्क्या होत जातात. आपल्याला प्रश्न पडत नाहीत.
गाभाऱ्यात सोवळ घालूनच का प्रवेश करायचा?
मासिक पाळी अपवित्र असं म्हणून महिलांना प्रवेश नाकारला जातो, मग पडसं झालेल्या व्यक्ती ला ही प्रवेश नाकारणार का?
घंटा का वाजवायची? प्रदक्षिणा का घालायची? 

आपल्याला प्रश्न पडत नाहीत. नंदीबैला प्रमाणे आपण मान डोलावत राहतो . बहुजन समाजाच्या मानसिक गुलामीच हे फार मोठे कारण आहे.

क्रिटिकल थिंकिंग करून प्रश्न विचारले पाहिजेत. हा उद्धटपणा वाटला तरी चालेल पण सयंत भाषेत प्रश्न विचारले पाहिजेत. या प्रश्नांनी देवाचा कोप होणार नाहीये पण देवाच्या नावाने धंदा मांडला आहे त्यांचे दुकान बंद होईल.

शांताराम - तू देव मानतो का? 

खंडेराव - हो. 

शांताराम - त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी तू काय करतो?

खंडेराव - इतरांना त्रास होणार नाही आणि माझ्या मनाला आंनद मिळेल अशी कामं करतो.

 शांताराम - म्हणजे?

खंडेराव - फिरायला जाण, व्ययाम करणं, गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करणं, आपलं कामं चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहणं. इत्यादी बाबी मला समाधान आनंद देतात. 

शांताराम - ठीक ए.. भेटू परत 

खंडेराव - सकाळी टेकडीवर फिरायला येतोस का?

शांताराम - नाहीरे, उद्या शनिवारी आहे. मला तेल वाहयाला जायचंय.

खंडेराव - ठीक आहे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...