मुख्य सामग्रीवर वगळा

पावनखिंड - रणजित देसाई ( मेहता पब्लिशिंग हाऊस )



छत्रपती शिवरायांनी रयतेच राज्य, स्वराज्य उभं केलं. ते करताना कित्येक मावळ्यांनी सर्वोच्च त्याग केला, प्राणुहिती दिली. काही नाव इतिहासात नोंदवली गेली काही अनामिक राहिली. पावनखिंडीतील थरार वाचताना या सर्वांच्या त्यागाची जाणीव होते, शेवटी डोळे पाणवतात.

घोडखिंड पावनखिंड कशी झाली? 

कृष्णाजी बांदल हे आदिलशाहीच्या बाजूनं देशमुखी सांभाळत होते. बांदल यांच्याकडे बाजीप्रभू देशपांडे प्रधान / दिवाण म्हणून होते. त्यांची हिरडस मावळा या प्रांतात सत्ता होती. शिवाजी राजांनी त्यांना स्वराज्यात सामील होण्याचं आवाहन केल होत. सलूख (समझोता ) होऊ शकला नाही. लढाई झाली त्यात कृष्णाजी बांदल यांना विरमरण आलं. त्यांचा रोहिडा किल्ला स्वराज्यात आला.

शिवरायांनी बांदल व बाजीप्रभू यांचे वतन तसेच त्यांच्याकडे ठेवले. झालं गेलं विसरून त्यांची मनं जिंकण्याला प्राधान्य दिल आणि स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यास भाग पाडलं.

बाजीप्रभू शिवरायांचे खास शिलेदार झाले. अफझल खान स्वराज्यवार चालून आला. महाराजांनी त्याचा निक्काल लावला. 
(10 नोव्हेंबर 1659) त्यानंतर आदिलशाहीतील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा लावला. या प्रत्येक वेळी बाजीप्रभू महाराजांबरोबर होते.

अफझल वधानंतर विजापूर वर आक्रमण होते की काय याने आदिलशाही भयभीत झाली. सिद्धी जौहर ला स्वराज्य वर पाठवण्यात आलं. 

महाराज पन्हाळा किल्ल्यावर असताना आदिशाही मधील सरदार सिद्धी जौहर ने किल्ल्या ला वेढा दिला. यांचवेळी शाहिस्तेखान 80 हजाराची फौज घेऊन पुण्यात दाखल झाला होता. पन्हाळ्यावरून निसटणं महाराजांसाठी, स्वराज्यसाठी महत्त्वाचं होतं. बाहेरून वेढा फोडण्याचा प्रयत्न नेताजी पालकर यांनी केला होता पण यश आलं नाही, त्यांना माघार घ्यावी लागली. परिस्थिती बिकट होती. महाराजांनी गनिमी कावा केला. सिद्धी जौहर ला आपण शरण येतोय असा भास निर्माण केला. सलूखा ची बोलणी सुरु झाली. वेढा ढिला पडला. महाराजांच सोंग घेऊन शिवा काशीद सिद्धी जौहर च्या छावणीत गेले. शिवराय विशाळगडाकडे निघाले.

सिद्धी जौहर ला खरं काय ते समजायला वेळ लागला नाही. शिवा काशीद यांना विरमरण देण्यात आलं.आणि मसूद ला महाराजांच्या पाठलागवर पाठवल. 
पाठलगावर असणाऱ्या गनिमांचा बंदोबस्त करायला बाजीप्रभू त्यांचा मोठा भाऊ फुलाजी, इतर 300 बांदल मावळ्यांसोबत घोडखिंडीत थांबले.
बाजीप्रभू यांच्यामध्ये वेगळंच चैतन्य संचारलं होत. घनघोर रणसंग्राम झाला. गनिमांना ते राक्षस वाटत होते. जय भवानीचा जयघोष करत 300 (बांदल) मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली गनिमांवर तुटून पडले. 
घोडखिंडीत अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले.
तोफेचे आवाज आले, महाराज विशालगडावर पोहचल्याची खूण बाजीप्रभूना मिळाली. मोहीम फत्ते केल्याच्या समाधानाने त्यांनी जखमी देह ठेवला, तो कायमचाच....

घोडखिंड पावनखिंड झाली.(13 जुलै 1660)

मनातलं -

👉🏽 महाराजांनी जीवाभावाची माणसं जोडली. शरणार्थी आलेल्यांना उदार होऊन मानाने वागवल.
👉🏽 प्रसंग बाका असेल तर विचारपूर्वक माघार घ्यायला महाराजांची ना नव्हती.
👉🏽महाराज हतबल होऊन निष्क्रिय झालेत असं कधीही झालं नाही.
👉🏽 शिवरायांचं सोंग घेऊन सिद्धी जौहर च्या छावणीत जाणे म्हणजे मृत्यू......याची कल्पना असूनही शिव काशीद यांनी इतकं धैर्य कस दाखवलं? आपली पत्नी, मुलं बाळ, वृद्ध आई-वडील यांचा विचार त्यांच्या मनात आला नसेल का? कुटुंबीयांशी अखेरच निर्वाणीचं ते काय बोलले असतील? 
👉🏽 बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, इतर मावळे यांना शारीरिक वेदना होत नसतील का? तलवारीचे घाव ही माणसं सोसत होती, देत होती. मृत्यू कायम पाठीवर घेऊन मुलुखगिरी करायला यांना कसं जमलं?  
👉🏽 छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असं कोणतं वलयं होत ज्याने आकर्षित होऊन मावळे लढायला सज्ज होते?

हे मावळे आणि त्यांचे बेभान होऊन जगणं पाहिलं की मी अचंबित होतोय. कसली हिंमत आणि जिगर होती यांच्यामध्ये. 

संकटाच्या छाताडावर थयाथया नाचायची, संकटाच्या नजरेमध्ये रोखून पाहयची हिम्मत मिळवायची असेल तर शिवराय आणि त्यांचे मावळे समजून घ्या.

"जय शिवराय" असं नुसतं म्हणायचं नाही आहे. शिवरायांचे गुण आत्मसात करायचे आहेत हे लक्षात घ्या.

💡लेखकाविषयीं 

मागे मी विद्रोही साहित्य संमेलनाला गेलो होतो. राजन खान वक्ते होते. बरेच लेखक त्यांच्या जातीच्या मर्यादा ओलांडून लेखन करू शकत नाही असं त्यांच्या म्हणण्याचा आशय होता. ते आठवण्याचं कारण म्हणजे रणजीत देसाई सुद्धा त्याला अपवाद नाही असं माझं मत आहे.

👉🏽 अफजलखानाचे सरदार मंबाजीराजे भोसले आहेत.
👉🏽 खानाचा मुलगा फाजलखान याला पळून जाण्यासाठी वाट खंडोजी खोपड्यान दाखवली.

हे सांगणारे रणजित देसाई, कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या विषयी चकार शब्द काढत नाहीत.

👉🏽 कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजलखानाचा वकील होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा हा एकमेव होता. ब्रह्म हत्या पाप आहेत असा समज असूनही कृष्णा भास्कर कुलकर्णी या स्वराज्य द्रोह्याला महाराजांनी स्वतःच्या तलवारीने यमसदनी पाठवला.
" ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवितो " असे महाराजांचे उद्गार होते.

👉🏽 रणजीत देसाई यांनी शिवा काशिद याचा उल्लेख शिवा न्हावी असा केला आहे. हे दुष्ट बुद्धीने हेतूने केले नसेल का? बहुजनांच्या नायकांविषयी लिहिताना कायम असा खोडसाळपणा केला जातो.

संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार..... ही काही उदाहरणं 

👉🏽 दादोजी कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा गुरु आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. 

कथा कादंबऱ्यांमधून किंवा सिनेमांमधून इतिहास समजून घेताना, यांनी cinematic liberty घेतली आहे याच भान सर्वांनी ठेवलं पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...