मुख्य सामग्रीवर वगळा

SIRAT ( सिरात )






चित्रपट आणि पुस्तकं आपल्यावर प्रभाव टाकतात. चांगल पुस्तकं, चित्रपट जीवनाची समज वाढवतं. आवडलेले पुस्तक वाचताना आपण तल्लीन होऊन जातो, पात्रांशी एकरूप होतो. चित्रपट पाहताना घटना वेगाने घडत असतात. थांबून विचार करायला फुरसत नसते. चांगला, नावाजलेला, कोणी सुचवलेला चित्रपट पहिल्या नंतर आपण त्यावर फ्रेम टू फ्रेम विचार करायला वेळ दिला पाहिजे.
आवडत्या पुस्तकाचा,कादंबरीचा अर्थ (आस्वाद) समजून घेण्यासाठी आपण थांबतो, विचार करतो तसंच चित्रपट पाहून झाल्यावर केलं पाहिजे.
SIRAT हा स्पॅनिश चित्रपट आहे. यंदा ऑस्कर साठी नामांकन मिळालं आहे, म्हणून माहिती झाला. मित्राने must watch सांगितले, पाहिला. मी निःशब्द झालोय, मनाच्या वेगळ्या ट्रान्स मध्ये गेलोय.चित्रपट, त्यातील पात्र, त्यांचे संवाद, त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी वेळ देतोय.ही प्रोसेस माणसांकडे पाहायचा दृष्टिकोन विकसित करत असेल का?...

SIRAT स्वर्ग - नर्क यांना जोडणारा अरुंद पूल, ज्याची धार तलवारीच्या पाताप्रमाणे आहे.

🚫 पुढे वाचल्यास चित्रपटचा 'स्पॉईलर' आहे 

एक बाप (Luis) आपल्या मुलीच्या (Mar) शोधात वाळवंटातील रेव्ह पार्टीत आला आहे. सोबत त्याचा 9-10 वर्षाचा मुलगा (Estabel) आहे. तिथे मुलगी सापडत नाही. त्याला माहिती मिळते,दक्षिण वाळवंटात ही अशीच पार्टी आहे. पार्टीला जायचा विचार करणाऱ्या इतर पाच अनोळखी लोकांबरोबर तो दक्षिणेकडे निघतो. अनोळखी माणसांबरोबर स्नेहबंध निर्माण होऊ लागतो .माणसं मुळात चांगली असतात पण मनाच्या pre conditioning मुळं आपण अविश्वास दाखवतो. असो
आयुष्याची उलथापालथ करणाऱ्या घटना त्या प्रवासात घडतात. ते भटकतात, माईन पेरलेल्या विस्तीर्ण वाळवंटात अडकतात. विस्फोटात त्यांच्या गाड्या निकामी होतात. हतबल होऊन मृत्यूची वाट पाहत असताना Luis ते 70-80 मीटर चं अंतर पार करतो. दुसरा त्याला विचारतो...
How did you manage to cross? How does this work?
Luis म्हणतो I don't know? I crossed without thinking?
आपण आयुष्याबद्दल फार विचार करत राहतो, कल्पनेतील चिंतांनी झुरत राहतो. प्रत्यक्ष कृतीची वेळ आलेली असताना हातबल होऊन बसतो. I crossed without thinking असं म्हणणारा Luis नकळत जीवनाचं मर्म सांगतोय. 
आपण विचार खूप करतो, अनुभव कमी घेतो आणि कृती त्याहून कमी करतो.
आपण स्वतः,आपले प्रियजण किंवा आपल्याला भेटणारी माणसं हे सर्व अनित्य आहे. कोणतं बोलणं हे अखेरच निरोपाचं असेल आपल्याला माहिती नाही हे सांगणारा SIRAT चित्रपट नक्की अनुभवावा.

Don't be serious, just feel it, live it, do it...

_सिद्धेश्वर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...